ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर देशात निर्माण झालेल्या युद्धसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत निर्णायक कारवाई सुरु आहे.त्यासाठी मोहन भागवत यांनी केंद्र सरकारचं नेतृत्व आणि तिन्ही सैन्य दलांना शुभेच्छा दिल्या आहेत.तसंच देशवासियांना आणि त्या दु:खी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यामुळे स्वाभामिन आणि देशाच मनोधैर्य दोन्ही उंचावलं आहे” असं आरएसएसने म्हटलं आहे.