लोकशाही राष्ट्र म्हणवणाऱ्या पाकिस्तानमध्ये आजवर एकही सरकार पूर्ण कार्यकाळ चालवू शकलेले नाही. संविधानात सुधारणा करून लष्करप्रमुख असीम मुनीर यांना तिन्ही दलांचे प्रमुख (CDF) बनवण्यात आले आहे, जे भारताच्या CDS प्रमाणे आहे. यामुळे पुन्हा लष्करी हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याची भीती आहे.