ठाणे महापालिकेमध्ये मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केलीय.. यावेळी बोलताना ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील असाही इशारा राऊतांनी दिलाय.त्याच्या या इशाऱ्यावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्रामध्ये कुणी कितीही प्रयत्न केला एकत्र आले. आमच्या ठिकऱ्या उडतील असं वक्तव्य केलं तर त्यांच्या हातात लोक टिकल्या देतील.. असा टोला एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.