अमरावतीत आता लग्नाच्या पत्रिकेवरून नवा वाद पेटलाय! वलगावमधील एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेत चक्क टिपू सुलतान यांचा प्रेरणास्थान' म्हणून उल्लेख केलाय. इतकंच नाही, तर टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याने आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पत्रिकेवरून राजकीय वातावरणही तापलंय.. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून..