मुंबईत पावसानं अशी काय दमदार एन्ट्री घेतली.की पहिल्याच पावसात मुंबईची पुरती वाट लागली.दरवर्षीच पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होते.पहिल्याच पावसात लोकल ठप्प होतात. वाहतुकीची बोंब होते. याहीवर्षी पाऊस आणि मुंबईनं तोच रेकॉर्ड कायम ठेवलाय आणि पहिल्याच पावसात मुंबईची जी वाट लागायची, ती लागलीच.पण यावेळी आणखी वेगळं काय घडलं.तर महापौर पाऊस परिस्थितीची पाहणी करायला बाहेर पडल्या होत्या.त्यांच्याच देखत महापालिकेची फजिती झाली.