लॉन्ग विकेंडमुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर, नवी मुंबईकर, ठाणेकर, पर्यटक, नागरिक बाहेर पडल्याने मोठी वाहतूक कोंडी होतीय.. रायगड जिल्ह्यातील दोन प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सकाळपासून वाहतूक कोंडी पाहायला मिळतीय.मुंबई-गोवा हायवेवर नागोठणे, कोलाड नाका, ते माणगावपर्यंत 50 किलोमीटरवर मोठी वाहतूक कोंडी झाली...यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झालीय.. नागोठणे आणि माणगावमधील स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.