युद्ध हा शेवटचा पर्याय असतो. एक सैनिक म्हणून मला आदेश आल्यास मी युद्धाला जाईन पण ती माझी पहिली पसंती नसेल असं वक्तव्य माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणेंनी केलंय. त्याचबरोबर युद्ध हे रोमॅटिक नसतं किंवा बॉलिवूड च्या सिनेमा सारखं नसतं. युद्ध म्हणजे एक गंभीर मुद्दा असल्याचं देखील ते म्हणाले.