अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात पुकारलेल्या युद्धामुळे जगभरात इंधन संकट घोंगावू लागलंय.होर्मुझ सामुद्रधुनीतून जलवाहतूक बंद असल्याने भारताला होणारा एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झालाय, अशी कबुली देत पंतप्रधान मोदी यांनी आज लोकसभेत निवेदन सादर केलंय. या युद्धाचे दीर्घकालीन परिणाम होणार असून कोरोना काळातील संकटासारखं आपल्याला लढावं लागणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलंय.