शूरता, वीरता, सुंदरता यासाठी अनेक राण्यांची, इतिहासात नोंद आहे पण नम्रता साधेपण आणि संवेदनशीलता यासाठी ओळखल्या जातात त्या राणी अहिल्याबाई होळकर. उत्तम राज्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहेच पण महेश्वरी साडीच्या रूपाने एक सुंदर अविष्कार त्यांनी जगाला दिला आहे. अहिल्याबाईंची आज त्रिशताब्दी जयंती आहे. अहिल्याबाई आणि महेश्वर साडीचं नातं कसं निर्माण झालं आणि त्याचा प्रवास कसा सुरु आहे याचा आजच्या दिवशी आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वधा वाघोले भोर हिच्या खास रिपोर्ट मधून.