Success Story: IAS, IRS, IPS... 3 मित्रांची 'क्लास वन' दोस्ती; एकत्र अभ्यास अन् UPSC पास; प्रेरणादायी कहाणी!

तीन मित्रांची एक खास स्टोरी प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यांनी एकमेकांना साथ देत, कठोर परिश्रमातून युपीएससीची परीक्षा क्रॅक करत एकाचवेळी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केले. 

जाहिरात
Read Time: 3 mins

friendship day 2026 upsc success story: आज फ्रेंडशिप डे.. मैत्री म्हणजे एक असं नातं जे असंख्य संकटांवर मात करत यशाच्या शिखराकडे झेप घेण्याचं सामर्थ्य देणारा भक्कम आधार. मैत्री म्हणजे फक्त सुंदर क्षण सोबत जगणं नव्हेतर एकमेकांच्या सोबतीने मोठं ध्येय गाठणं. आज फ्रेंडशिपडे निमित्त अशाच तीन मित्रांची एक खास स्टोरी प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यांनी एकमेकांना साथ देत, कठोर परिश्रमातून युपीएससीची परीक्षा क्रॅक करत एकाचवेळी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केले. 

Pandharpur News: तुम्हीही करा पंढरीच्या विठ्ठल- रखुमाईची सेवा! पुजेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु; कसं कराल बुकिंग?

IAS, IRS, IPS .. या मैत्रीला कडक सलाम! 

असे म्हटले जाते की यूपीएससीची तयारी करणे हा एक खूप एकाकी प्रवास आहे, पण सिद्धार्थ, चंद्रप्रभा आणि खुशाली यांनी आपल्या मैत्रीच्या जोरावर हा प्रवास अविस्मरणीय बनवला. हे तिघे मित्र टेलिग्रामवरील सहा जणांच्या एका स्टडी ग्रुपमधून भेटले. त्यानंतर, त्यांनी आपल्या कठोर परिश्रमातून यशाची गाथा रचली. वेगवेगळ्या शहरांतील असूनही, दररोज रात्री १० वाजता ऑनलाइन एकत्र येणे हा त्यांचा नित्यक्रम बनला होता. दिवसाच्या अभ्यासावर चर्चा करणे, सराव मुलाखती घेणे, चुका सुधारणे आणि कोणी निराश झाल्यावर त्याला आधार देणे, ही त्यांच्या "डिजिटल ग्रुप स्टडी"ची ओळख बनली.

Advertisement

एका ऑनलाइन क्लासमधून सुरू झालेली मैत्री, आता तीन अधिकाऱ्यांसाठी यशाचे उदाहरण बनली आहे. १६ एप्रिल २०२४ रोजी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला, तेव्हा या तिनही मित्रांचा आनंद गगनात मावेनासा झाला.  त्या तीन मित्रांपैकी एक आता आयएएस (IAS) अधिकारी, दुसरा आयआरएस (IRS) अधिकारी आणि तिसरा आयपीएस (IPS) अधिकारी आहे.

वेगवेगळी शहरं, ध्येय एक.. गोष्ट तीन मित्रांची! 

1. सिद्धार्थ श्रीवास्तव, बनारस, उत्तर प्रदेश
बनारसचे सिद्धार्थ श्रीवास्तव यांनी आयआयटी बीएचयू (IIT BHU) मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मारुती सुझुकीमधील आपली नोकरी सोडली. चार प्रयत्नांत अपयशी ठरल्यानंतर ते नायब तहसीलदार झाले, पण त्यांनी आयपीएस अधिकारी बनण्याचे आपले स्वप्न कधीच सोडले नाही. तो पाचव्या प्रयत्नात मुलाखतीतून बाद झाला, पण त्याच्या समर्पणाने आणि मित्रांच्या पाठिंब्याने, त्याने अखेरीस सहाव्या प्रयत्नात ११८ वा क्रमांक मिळवला आणि तो आयपीएस अधिकारी बनला. या यशाने सिद्धार्थने लहानपणी नॉर्थ ब्लॉकसमोर वडिलांना दिलेले वचन पूर्ण केले.

 2. चंद्रप्रभा शर्मा, मुंबई, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील चंद्रप्रभा शर्मा यांनी अमेरिकेतील जॉर्जटाउन विद्यापीठातून पब्लिक पॉलिसीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून आणि अनेक आंतरराष्ट्रीय पर्यावरण प्रकल्पांवर काम करून राष्ट्रसेवेसाठी भारतात परतल्या. २०१६ मध्ये सुरू झालेला त्यांचा संघर्ष अनेक अडथळ्यांनंतर २०२३ मध्ये सहाव्या प्रयत्नात यशस्वी झाला. त्या २८९ व्या क्रमांकासह आयआरएस अधिकारी बनल्या. चंद्रप्रभा यांचे कुटुंब पर्यावरणाबद्दल इतके जागरूक आहे की लोक त्यांना प्रेमाने "डब्बा वाली फॅमिली" म्हणतात.

3. खुशाली सोलंकी, बिकानेर, राजस्थान

राजस्थानमधील बिकानेर येथे राहणाऱ्या खुशाली सोलंकी यांना एनआयटी सुरतमध्ये शिकत असतानाच आयआयटी मुंबईमध्ये पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेशाची संधी मिळाली. मात्र, देशसेवेच्या तीव्र इच्छेने प्रेरित होऊन त्यांनी आयआयटीचे स्वप्न सोडून दिले. त्या पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अयशस्वी ठरल्या, पण त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि गटाच्या मार्गदर्शनाने त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात ६१ वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी बनल्या. सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांचा विश्वास जिंकणारी अधिकारी बनण्याचे खुशाली यांचे स्वप्न होते.

Advertisement

Unique Wedding: अरे देवा! जुळ्या वधू, जुळे नवरदेव, लग्नात सगळे... असा अजब विवाह सोहळा पुन्हा होणे नाही!