कोणत्या लोकांनी रोज नाश्त्यामध्ये शिळी पोळी खाल्ली पाहिजे?

Edited by Harshada J S Image credit: Canva

शिळी पोळी खायचे म्हटलं की
लोक तोंड मुरडतात. तर काही लोक
थेट खाणं टाळतात. 

Image credit: Canva

पण काही लोकांसाठी शिळी पोळी खाणे फायदेशीर ठरू शकते. 

Image credit: Canva

पोळी शिळी झाल्यानंतर ती खराब होत नाही तर पौष्टिक होते. कारण यातील पोषणतत्त्वांचे प्रमाण वाढते, असे म्हणतात.

Image credit: Canva

शिळी पोळी कोणी खाल्ली पाहिजे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते आणि रक्तशर्करेची पातळी देखील नियंत्रणात राहते. 

Image credit: Canva

रिकाम्या पोटी एक शिळी पोळी थंड दुधामध्ये भिजवून खाल्ल्यास रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते. वारंवार भूक देखील लागत नाही. 

Image credit: Canva

शिळ्या पोळीमध्ये फायबर अधिक असते, यामुळे पचनप्रक्रिया निरोगी राहण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

शिळ्या पोळीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होऊ शकते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळू शकते. 

Image credit: Canva

शिळ्या पोळीमध्ये लोह आणि झिंक यासारख्या खनिजांचा समावेश आहे. लोहामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते. 

Image credit: Canva

शिळ्या पोळीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते, यामुळे हाडे-दात मजबूत होण्यास मदत मिळते. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Image credit: Canva

आणखी वाचा

 रिकाम्या पोटी केळी खाण्याचे मोठे दुष्परिणाम

marathi.ndtv.com