अदाणी समूहाकडून ओडिशातील पुरी येथे सुरू असलेल्या भगवान जगन्नाथ रथयात्रेत प्रसाद सेवा सुरू करण्यात आलीय.
रथयात्रेत सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना, सेवकांना तसेच सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना अदाणी समूहातर्फे भोजन देण्यात येत आहे.
अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबतची माहिती शेअर केलीय.
Image credit: PTI
महाप्रभू श्री जगन्नाथजींच्या असीम कृपेने, आम्हाला पुरी धामच्या पवित्र रथयात्रेत सेवा देण्याचे सौभाग्य लाभल्याचे अदाणींनी पोस्टमध्ये म्हटलंय.
Image credit: PTI
आजपासून सुरू झालेली ही दिव्य यात्रा तो क्षण आहे जेव्हा स्वतः भगवान आपल्या भक्तांमध्ये येऊन त्यांना दर्शन देतात, असेही गौतम अदाणी यांनी म्हटलंय.
Image credit: PTI
ही केवळ एक यात्रा नसून भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अनुपम उत्सव असल्याचे गौतम अदाणी म्हणाले आहेत.
Image credit: PTI
या पुण्यप्रसंगी लाखो भाविकांच्या सेवेसाठी अदाणी परिवार पूर्ण निष्ठा आणि श्रद्धेने समर्पित आहे:गौतम अदाणी, चेअरमन, अदाणी समूह
Image credit: PTI
प्रत्येक भक्ताला स्वच्छ, पौष्टिक आणि प्रेमाने वाढलेले भोजन मिळावे याच संकल्पाने पुरी धाममध्ये 'प्रसाद सेवा' सुरू केल्याची माहिती अदाणींनी दिलीय.
Image credit: PTI
पुरीच्या या पुण्यभूमीवर एक सेवक म्हणून जोडले जाणे हे माझ्यासाठी, समस्त अदाणी परिवारासाठी अत्यंत गौरव आणि समाधानाची बाब आहे:गौतम अदाणी, चेअरमन, अदाणी समूह
Image credit: PTI
प्रार्थना करतो की महाप्रभू श्री जगन्नाथजींची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. नर सेवा ही नारायण सेवा आहे आणि सेवा हीच साधना आहे, अशा भावना अदाणींनी व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा
आषाढी एकादशीला पंढरपुरात जायचंय? राहण्याची सोय, खर्च-बुकिंगची माहिती वाचा