Fastag Rule: चारचाकी वाहनांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नियम मोडला तर...
Edited by Harshada J SImage credit: PTI
राज्यातील चारचाकी वाहन धारकांबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Image credit: PTI
1 एप्रिल 2025पासून चारचाकी वाहन धारकांना फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Image credit: IANS
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिलीय. बैठकीच्या अध्यक्षस्थानी CM देवेंद्र फडणवीस होते.
Image credit: Eknath Shinde X
या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे, असेही म्हटले जातंय.
Image credit: PTI
फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.
Image credit: Canva
त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड क्रेडिट, डेबिट कार्ड, कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल तरीही दुप्पट शुल्क भरावे लागेल.
Image credit: Canva
MSRDCच्या अखत्यारीत 50 टोलनाके येतात, यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात 23 टोल नाके आहेत.
Image credit: PTI
या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती ही उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलीय.
Image credit: Eknath Shinde X
आणखी वाचा
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, मतदान आणि मतमोजणीची ठरली तारीख