क्षणातच नीलकमल बोट समुद्रात बुडाली, 13 जणांचा मृत्यू

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणाऱ्या बोटीचा बुधवारी (18 डिसेंबर) भीषण अपघात झाला.

Image credit: PTI

नौदलाची स्पीड बोट नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला धडकल्याने भीषण दुर्घटना घडली.

Image credit: PTI

नीलकमल प्रवासी फेरी बोटीच्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झालाय. 

Image credit: PTI

नौदलाच्या स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी सुरू होती.

Image credit: PTI

पण दुपारी 4 वाजेदरम्यान नौदलाच्या कर्मचाऱ्याचे स्पीड बोटीवरील नियंत्रण सुटले. 

Image credit: PTI

करंजाजवळ नौदलाच्या बोटीची नीलकमल बोटीला धडक बसली आणि मोठा अपघात घडला.

Image credit: PTI

नीलकमल प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाच्या दिशेने प्रवास करत होती. 

Image credit: PTI

अपघातानंतर नौदलाने तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य तातडीने सुरू केले. 

Image credit: PTI

बचाव कार्यात नौदलाच्या 4 हेलिकॉप्टरसह 11 बोटी, तटरक्षक दलाची एक बोट आणि सागरी पोलिसांच्या तीन बोटींची मदत घेण्यात आली. 

Image credit: PTI

जीव वाचवलेल्या प्रवाशांना अन्य जेटींवर हलवण्यात आले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले, अशी माहिती नौदलाने दिली.

Image credit: PTI

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सात पुरुष, चार महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. 

Image credit: PTI

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 101 प्रवाशांना वाचवण्यात आले आहेत.

Image credit: PTI

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत CM फडणवीस यांनी जाहीर केली.

Image credit: PTI

मृतांमध्ये नौदलाच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

Image credit: PTI

दुर्घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल : CM फडणवीस 

आणखी वाचा

शरद पवार शेतकऱ्यांसह PM मोदींच्या भेटीला, कारण...

marathi.ndtv.com