मुंबईत कोसळधार, पाणी साचल्याने रस्ते-रेल्वे वाहतुकीवर परिणाम PHOTOS 

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

मुंबईमध्ये रविवारी (25 मे) रात्रीपासून पावसाने जोर धरलाय. सोमवारी (26 मे) सकाळी देखील जोरदार पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पाणी साचलंय.

Image credit: PTI

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी 27 मेपर्यंत सकाळी 8.30 वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला आहे. 

Image credit: PTI

मुसळधार पावसामुळे रेल्वे-रस्ते वाहतूक सेवेवर परिणाम झालाय. 

Image credit: PTI

रेल्वे रुळांवर पाणी जमा झाल्याने हार्बर रेल्वेमार्गावरील सेवा विस्कळीत झालीय. 

Image credit: PTI

मध्य रेल्वेवरील भायखळा, दादर, माटुंगा आणि बदलापूर रेल्वे रुळांवर पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे.

Image credit: PTI

किंग्स सर्कल, मंत्रालय, दादर टीटी ईस्ट, परेल टीटी, काळाचौकी, चिंचपोकळी आणि दादर स्टेशन परिसरातही पावसाचे पाणी साचलंय.

Image credit: PTI

मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाले आहे.

Image credit: PTI

मुंबई मेट्रो 3 अ‍ॅक्वा लाइनवरील वाहतूक सेवाही विस्कळीत झालीय. पावसाचे पाणी शिरल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

Image credit: PTI

त्यामुळे आचार्य अत्रे चौकाऐवजी फक्त वरळी स्टेशनपर्यंतच सेवा सुरू असेल,अशी माहिती मुंबई मेट्रो प्रशासनाने दिलीय. 

Image credit: PTI

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 25 मेच्या मध्यरात्रीपासून ते 26 मे सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी जाणून घेऊया...

Image credit: PTI

नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्र 252 मिमी, A विभाग कार्यालय 216 मिमी, महानगरपालिका मुख्यालय 214 मिमी, कुलाबा उदंचन केंद्र 207 मिमी

Image credit: PTI

नेत्र रूग्णालय(दोन टाकी) 202मिमी, सी विभाग कार्यालय (चंदनवाडी,मरीन लाइन्स) 180मिमी, मेमनवाडा अग्निशमन केंद्र 183मिमी, ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी 171मिमी

Image credit: PTI

 नारियलवाडी शाळा (सांताक्रूझ) 103मिमी, सुपारी टँक (वांद्रे)101मिमी, जिल्हाधिकारी वसाहत (चेंबूर) 82मिमी, L विभाग कार्यालय (कुर्ला) 76मिमी पावसाची नोंद करण्यात आलीय.

Image credit: PTI

मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Image credit: PTI

हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेमुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.

Image credit: PTI

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा तसेच अधिक पाऊस पडत असलेल्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. 

Image credit: PTI

पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, कोणतीही जीवित/वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

Image credit: PTI

हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी: DCM शिंदे

Image credit: PTI

राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबवण्यात येत आहेत: DCM शिंदे

आणखी वाचा

PM नरेंद्र मोदींसाठी 26 मे ही तारीख अतिशय खास आहे, कारण..

marathi.ndtv.com