मुंबई ते नागपूर प्रवास होणार 8 तासांत, समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण
Edited by Harshada J S Image credit: MSRDC Image credit: MSRDC मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (5 जून) समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत.
Image credit: MSRDC समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर अंतिम टप्प्याचे CM फडणवीस उद्घाटन करतील.
Image credit: MSRDC 5 जूनपासून समृद्धी महामार्ग प्रवासासाठी पूर्णपणे खुला होईल.
Image credit: MSRDC मुंबई - नागपूर प्रवासासाठी यापूर्वी 17-18 तास लागत होते, या महामार्गामुळे हा प्रवास केवळ आठ तासांमध्ये करणे शक्य होणार आहे.
Image credit: MSRDC समृद्धी महामार्गावरील 625 किलोमीटरचा भाग यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.
Image credit: MSRDC उद्घाटन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहतील.
Image credit: MSRDC सुमारे 55,000 कोटी रुपये खर्च करुन बांधलेला या सहापदरी मार्गाचे नाव 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असे आहे.
Image credit: MSRDC समृद्धी महामार्ग एकूण 10 जिल्हे आणि 392 गावांमधून जातो.
Image credit: MSRDC समृद्धी महामार्गामुळे आता मुंबई ते नागपूरचा प्रवास सुसाट होणार आहे.
आणखी वाचा
बंगळुरू स्टेडिअमजवळ चेंगराचेंगरी, दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती PHOTOS
marathi.ndtv.com