Air India: एअर इंडियाच्या दुबईहून जयपूरला येणाऱ्या विमानातला भयंकर प्रकार, तब्बल 5 तास लहान मुलं-वृद्ध...

दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट IX 196 ला निर्धारित वेळेनुसार 7:25 वाजता दुबईहून निघायचे होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे तिच्या उड्डाणाला काही तास उशीर झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

अहमदाबाद विमान अपघातानंतर विमानांच्या तांत्रिक बिघाडाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटला 5 तास उशीर झाल्याची माहिती समोर आली आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला उड्डाण करण्यास हा विलंब झाल्याचे समजते. मात्र, या संपूर्ण प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दुबई विमानतळावर विमानात बसलेले प्रवासी एसी शिवायच बसले होते. प्रवाशांमध्ये लहान मुले आणि वृद्धही होते. प्रचंड उष्णतेमुळे अनेकांची प्रकृती ही बिघडली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले आहे की, दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट IX 196 मध्ये प्रवाशांना पाच तास एसी न चालवता बसवून ठेवण्यात आले. यावेळी विमानात उपस्थित वृद्ध आणि लहान मुलांची तब्येत बिघडली. ही घटना 13 जूनच्या रात्रीची आहे. दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट IX 196 ला निर्धारित वेळेनुसार 7:25 वाजता दुबईहून निघायचे होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे तिच्या उड्डाणाला काही तास उशीर झाला.

शेवटी 12:45 वाजता फ्लाइट दुबईहून जयपूरसाठी निघाली. परंतु त्याआधी प्रवाशांना 5 तास विमानात एसीशिवाय बसवून ठेवण्यात आले. यावेळी विमानाच्या आत प्रचंड उष्णता होती, ज्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांची तब्येत बिघडली. प्रवाशांनी एअरलाईन्सवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आरोप केला की, यावेळी त्यांना पाणीही उपलब्ध करून देण्यात आले नाही. विलंबाबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही असा आरोप प्रवाशांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Pune Bridge collapses: कुंडमळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कसा कोसळला? कारण आलं समोर

प्रवाशांनी सांगितले की, एसीशिवाय आम्ही 5 तास प्रचंड उष्णतेत विमानात बसून राहिलो. यावेळी लहान मुले रडत होती आणि वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होत होता. हे प्रकरण आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रवाशांनी DGCA आणि एअरलाईन्स व्यवस्थापनाकडून उत्तर मागितले आहे. एअर इंडिया एक्सप्रेसकडून या संपूर्ण घटनेवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Advertisement