India Pakistan War: 'रेशन भरून ठेवा, कारण आता पाकिस्तानची बारी'; महिला ज्योतिष्याने सांगितली युद्धाची तारीख!

India Pakistan War Prediction: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कसे वळण घेतात याच्या चर्चा नेहमीच रंगत असतात.  

जाहिरात
Read Time: 3 mins
इराणनंतर आता पाकिस्तानची बारी आहे, असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय.
मुंबई:

India Pakistan War Prediction: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कसे वळण घेतात याच्या चर्चा नेहमीच रंगत असतात.   सध्या सोशल मीडियावर एका महिला ज्योतिष्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तिने चक्क या दोन देशांमधील युद्धाची तारीखच जाहीर केली आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या वैदिक ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञाने केलेला दावा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या महिलेने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला असून भारताकडून पाकिस्तानवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे.

ज्योतिषाने वर्तवली युद्धाची तारीख

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या ज्योतिष्याने दावा केला आहे की, 21 मार्च 2026 रोजी भारताकडून पाकिस्तानवर मोठा हल्ला होऊ शकतो. या दाव्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. तिने प्रेक्षकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे. आपल्या घरात किमान 1 ते 2 महिन्यांचे खाण्यापिण्याचे रेशन, रोख रक्कम, औषधे आणि फोनसाठी सोलर चार्जर तयार ठेवावा, कारण इराणनंतर आता पाकिस्तानची बारी आहे, असे तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

( नक्की वाचा : Iran War : अमेरिकन फायटर जेट्स भारत कधीही खरेदी का करत नाही? वाचा अमेरिकेच्या 'डबल गेम'ची ती जुनी गोष्ट! )

असे आहे ग्रहांचे गणित

या ज्योतिषाने आपल्या दाव्यामागे ज्योतिषशास्त्रीय गणितांचा आधार दिला आहे. तिच्या मते, 21 मार्च 2026 रोजी अशा काही ग्रहांची स्थिती निर्माण होत आहे जी युद्धासाठी कारणीभूत ठरू शकते. तिने सांगितले की, त्या दिवशी रिक्त तिथी असेल आणि रमझान महिना संपलेला असेल, तर 19 मार्चपासून नवरात्रीला सुरुवात झालेली असेल. कुंडलीच्या चौथ्या घरात बुध, राहू आणि मंगळ असल्याने 'अंगारक योग' तयार होत आहे, तर पाचव्या घरात सूर्य, शनी, नेपच्यून आणि शुक्र एकत्र येत आहेत. वृश्चिक लग्न आणि ज्येष्ठा नक्षत्रातील ही स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींच्या कुंडलीचा संदर्भ

या ज्योतिष्याने केवळ ग्रहांची स्थितीच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीचाही उल्लेख केला आहे. तिच्या दाव्यानुसार, देशाच्या मंगळ महादशेत राहूची अंतरदशा सुरू आहे, जी अंगारक योगाला अधिक सक्रिय करते. तसेच पंतप्रधान मोदींची स्वतःची मंगळ महादशा आणि भूतकाळात त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय हे सर्व संकेत देतात की 21 मार्च 2026 ही तारीख इतिहासात कायमची लक्षात ठेवली जाईल. या हल्ल्यानंतर भारताच्या सीमा बदलतील आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) भारतात परत येण्याची ही सुरुवात असेल, असा मोठा दावाही तिने केला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Baba Vanga: 2026 मध्ये काय होणार? इराणमधील युद्धामुळे बाबा वेंगांचे भयानक भाकीत चर्चेत; बघा काय आहे पूर्ण सत्य )

नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या ज्योतिष्यावर टीका केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, प्रत्येक ज्योतिषी आपले भाकीत खरे ठरवण्यासाठी असे व्हिडिओ बनवत आहे. 

दुसऱ्या एका व्यक्तीने संताप व्यक्त करत लिहिले की, देवासाठी लोकांसाठी भीती पसरवू नका. केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी अशा नकारात्मक गोष्टी पसरवणे चुकीचे आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. तर काही लोकांनी याला केवळ 'कंटेंट' तयार करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

पाहा VIDEO