'शोले'साठी अमजद खान यांना डायलॉगफेक शिकवल्याचा सचिन पिळगावकर यांचा दावा, जितेंद्र आव्हाड म्हणतात...

Sachin Pilgaonkar Vs Jitendra Awhad : सचिन पिळगावकरांच्या दाव्यावर सवाल उपस्थित करण्याचं धैर्य जितेंद्र आव्हाड यांनी दाखवलं खरं, मात्र आता ते त्यांच्याच अंगलट येताना दिसत आहे. कारण जितेंद्र आव्हाड यावरून ट्रोल होताना दिसत आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

Sachin Pilgaonkar Vs Jitendra Awhad : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची वक्तवे आणि दावे यावर सोशल मीडियावर टीका करणारे अनेकजण आहेत. अनेकांना त्यांचे अनेक दावे पचनी पडत नाही. सचिन पिळगावकर यामुळे अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतात. मात्र अशा ट्रोलर्सना कुणी फारसं मनावर घेत नाही. मात्र आता सचिन पिळगावकर यांच्या एका दाव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. 

अभिनेते अमजद खाना यांना 'कितने आदमी थे.." हा अजरामर डायलॉग मी शिकवल्याचा दावा काही दिवसांपूर्वी सचिन पिळगावकर यांनी केला होता. यावर जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की,  "शोले हा सिनेमा 1975 साली रिलीज झाला. त्यावेळी सिनेरसिकांनी शोले सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक-एक डायलॉग त्यावेळच्या पिढीच्या तोंडावर होता. डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा गाजला, मला नाही वाटत तेवढा कोणता अभिनेता दरोडेखोराच्या भूमिकेमध्ये गाजला असेल." 

Advertisement

(नक्की वाचा-  Love Story: नवऱ्यासमोरच पत्नीने केलं पुतण्यासोबत लग्न! अजब प्रेमाची देशभर चर्चा)

"गब्बरसिंग अन् अमजद खान ही हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर नावे आहेत. पण, हे काही मनाला पटले नाही की,  गब्बरसिंग म्हणजेच अमजद खान यांना डायलॉग फेकण्याचे कौशल्य- आदब हे त्या सिनेमातील बालकलाकार सचिन पिळगावकर याने शिकवली. कारण, अमजद खान यांचे वडील झकारिया खान अर्थात जयंत हेदेखील 1950-60 च्या दशकातील नामांकित अभिनेते होते. म्हणजेच चित्रपटसृष्टीत खानदान असलेल्या अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किंवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी, हे पचनी पडतच नाही. आज अमजद खान आपल्यात नाहीत आजही जो कुणी शोले बघेल तो अमजद खान म्हणजेच गब्बर सिंगला विसरूच शकत नाही", असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. 

सचिन पिळगावकरांच्या दाव्यावर सवाल उपस्थित करण्याचं धैर्य जितेंद्र आव्हाड यांनी दाखवलं खरं, मात्र आता ते त्यांच्याच अंगलट येताना दिसत आहे. कारण जितेंद्र आव्हाड यावरून ट्रोल होताना दिसत आहेत. तुम्ही आमदार आहात. तुमचं काम काय? तुम्ही कोणते मुद्दे हाताळले पाहिजे? तुम्ही कोणते मुद्दे हाताळताय? मुळात हा मुद्दा तरी आहे का? असे अनेक प्रश्ना जितेंद्र आव्हाड यांना युजर्स विचारत आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा- Jalgaon News : संपत्तीचा मोह! निलंबित पोलिसाने भाच्याला संपवलं, कसा रचलं कट?)

जितेंद्र आव्हाडांवर नेटिझन्सची टीका

एकाने कमेंटमध्ये म्हटलं की, "आपलं काम काय, आपण करतोय काय? कमीत कमी विरोधक म्हणून तर धड काम करा." आणखी एका युजरने म्हटलं की, "ह्यावर तुमचं मत मांडणे एवढं गरजेचं कसं वाटू शकते तुम्हाला."  दुसऱ्या एकाने म्हटलं की, "यावरून असं दिसून येतं की साहेबांकडे किती फावला वेळ आहे, यामुळेच विरोधी पक्षात आहेत, अरे काय हे , तोंड दिलंय म्हणून काहीही बडबड करायची का?"

Advertisement

काय म्हणाले होते सचिन पिळगावकर?

एका मुलाखतीत सचिन पिळगावर यांनी म्हटलं होतं की, "अमजद खानला 'कितने आदमी थे' डायलॉग बोलायला जमतच नव्हता. मी त्याला कानमंत्र दिला. मी अमजदला सांगितलं माईकच्या जवळ उभा राहा, आणि वरच्या पट्टीत नको बोलूस खालच्या पट्टीत बोल. कारण माझ्यामागे तो अनुभव होता, जो अमजदच्या मागे नव्हता."

Topics mentioned in this article