Raj Thackeray On Hindi Controversy : शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीबाबतचा शासन निर्णय सरकारने रविवारी मागे घेतला. सरकारच्या या निर्णयानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. 5 जुलै रोजी सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात येणार होतं. मात्र सरकारच्या निर्णयानंतर काय होणारा याची प्रतीक्षा सर्वांना होती. 5 जुलै रोजी विजयी मेळावा होणार, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. विजयी मेळाव्याची घोषणा करताना, विजय मेळावा कुठे आणि कसा होणार याबाबत सर्वांचा चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं देखील राज ठाकरे यांनी सांगितलं.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी म्हटलं की, "काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले. रद्द करायला त्यांना भाग पाडले. त्यासाठी मी तमाम महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो. सर्व बाजूंनी रेटा आला. खरतरं काही गरज नसताना हा विषय आला होता. तो रद्द करावा लागला. त्याबद्दल मी मराठी जनांचे, साहित्यिकांचे आणि मोजक्या कलाकारांचे आभार मानतो."
"हा विषय काही श्रेयवादाचा नाही. मात्र हा विषय समोर आल्यानंतर आम्ही त्याला विरोध केला. मागच्यावेळी पाठवलेली तिन्ही पत्रे मी वाचून दाखवली होती. आम्हाला उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी पाठिंबा दिला. 5 तारखेला आम्ही मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा निघाला असता तर न भुतो न भविष्य निघाला असता. संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता. सरकारला मराठी माणसाची ताकद कळाली असती," असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
Raj Thackeray: 'ही भीती असली पाहीजे', हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर राज ठाकरेंचे सुचक वक्तव्य
दरम्यान, दादा भुसे आले तेव्हा मी सांगितलेलं तुमचे ऐकून घेईन पण ऐकणार नाही. यामध्ये कोणतेही तडतोड होणार नाही. त्यांनी हा प्रयत्न केला मात्र तो त्यांच्याच अंगलट आला. त्यांनी समिती नेमावी, त्याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही, मात्र परत हा निर्णय होणार नाही. त्याची काळजी घ्यावी,.असं देखील राज ठाकरे म्हणाले.