Rain news: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट

राज्यात मागील 24 तासांमध्ये म्हणजेच 23 जून 2025 रोजी सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात 73.3 मिमी पाऊस झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

कोकण किनारपट्टीला आज सोमवारी 23 जून संध्याकाळी साडेपाच पासून 25 जून 2025 ला रात्री 8-30 वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने हा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सांगितले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यात मागील 24 तासांमध्ये म्हणजेच  23 जून 2025 रोजी सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात 73.3 मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 36.4,  रत्नागिरी जिल्ह्यात 25.8 मिमी, ठाणे जिल्ह्यात 14.3  आणि कोल्हापूर जिल्ह्यात 13.9 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.राज्यात कालपासून आज 23 जून सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहेत. हे सर्व आकडे मिलिमीटरमध्ये आहेत. त्यात ठाणे  14.3, रायगड 10.7, रत्नागिरी 25.8,  सिंधुदुर्ग 36.4, पालघर 73.3, नाशिक 6.2, धुळे 0.5, नंदुरबार 2.9, जळगाव 0.9, अहिल्यानगर 0.2, पुणे 4.3, सोलापूर 0.1 मिलिमिटर नोंद झाली आहे. 

Advertisement

ट्रेंडिग बातमी - Crime News: 50 वर्षाचा शिक्षक, 17 वर्षांची विद्यार्थीनी, 1 वर्षापासून अत्याचार अन् शेवटी...

 त्याच बरोबर  सातारा 4.7,  सांगली 2.8,  कोल्हापूर 13.9, छत्रपती संभाजीनगर 1, जालना 1.1, धाराशिव 0.2, नांदेड 0.3, हिंगोली 0.4, बुलढाणा 1.1, अकोला 3.4, वाशिम 0.4 अमरावती 0.5, यवतमाळ 0.6, वर्धा 0.2, नागपूर 1.5, भंडारा 0.6, गोंदिया 1.7, चंद्रपूर 2.5 आणि गडचिरोली जिल्ह्यात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात पुरात वाहून एक व खड्यामध्ये बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिह्यात नदीत वाहून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.