sonam Raghuvanshi: 'बेवफा'सोनम! एकदा नाही, दोनदा नाही, तर 'इतक्या' वेळा केला होता राजाला मारण्याचा प्रयत्न

सोनमला मेघालयात हनिमूनदरम्यान तिचा पती राजा रघुवंशी (29) च्या कट रचून केलेल्या हत्येमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

राजा रघुवंशी हत्याकांडात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सोनम रघुवंशीने राजावर एक-दोनदा नाही, तर चार वेळा हल्ला केला होता. पहिल्या तीन प्रयत्नांत राजा वाचला होता. पण चौथ्या प्रयत्नात सोनम रघुवंशी आणि तिचे साथीदार राजाला ठार करण्यात यशस्वी झाले. सोनम रघुवंशीसह इतर आरोपींनी यापूर्वी तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी राजाच्या हत्येचा प्रयत्न केला होता.परंतु काही कारणांमुळे त्यांना राजाला मारता आलं नाही. पोलिस अधीक्षक विवेक सायम यांनी पत्रकार परिषदेत ही धक्कादायक माहिती दिली. राजा रघुवंशीची हत्या चौथ्या प्रयत्नात करण्यात आली असंही त्यांनी सांगितलं. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तीन वेळा अपयश, पण चौथ्या प्रयत्नात यश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राजाला मारण्याचा पहिला प्रयत्न गुवाहाटीमध्ये करण्यात आला. पण तो वाचला. सोनम आणि तिच्या साथीदारांनी पहिला प्रयत्न यशस्वी न झाल्याने सोहरामध्ये ही त्याला मारण्याचे दोन कट रचले. शेवटी वेई सावडाँगमध्ये सोनम आणि तिच्या साथीदारांनी चौथा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले.' विवेक सायम यांनी आरोपींच्या कटाचा खुलासा करताना सांगितले, 'त्यांना राजाला लवकरात लवकर संपवायचे होते. राजाला गुवाहाटीमध्येच कुठेतरी मारायचे होते, पण तसे होऊ शकले नाही. असं पोलिसांनी सांगितलं. त्यांना त्याला नोंग्रियाटमध्ये मारायचे होते, पण त्यांना मृतदेह लपवण्यासाठी जागा मिळाली नाही. राजा शौचाला गेला असताना, त्यांना राजाला मावलखियात आणि वेईसावडाँगच्या मध्येही मारायचे होते. पण तिथेही ते यशस्वी होऊ शकले नाहीत. शेवटी, त्यांनी राजाला वेईसावडाँगमध्ये ठार मारले.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash : झेप घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं पण...; डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेची कहाणी अपूर्णच राहिली

Advertisement

आरोपी 19 मे रोजीच गुवाहाटीला पोहोचले 
विवेक सायम यांनी सांगितले, 'जेव्हा सोनम आणि राजा लग्नानंतर कामाख्या माता मंदिरात दर्शनासाठी गुवाहाटीला पोहोचले, तेव्हा मारेकरी 19 मे रोजीच गुवाहाटीला पोहोचले होते. त्यांची सुरुवातीची योजना राजाला गुवाहाटीमध्येच मारण्याची होती. पण सोनमने शिलाँग आणि सोहराला जाण्याची योजना बनवली होती. त्यामुळे ही योजना तशीच राहिली.' राजा रघुवंशीच्या मारेकऱ्यांची योजना एखाद्या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळण्याची होती, जेणेकरून तो राजाची पत्नी सोनमचा मृतदेह आहे असे भासवता येईल. त्यानंतर सोनम सत्य समोर येईपर्यंत काही दिवस लपून राहील. मेघालय पोलिसांना हे देखील समजले की सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह हा हत्येच्या कटाचा सूत्रधार होता. ती सह-सूत्रधार होती. सोनमच्या चौकशीच्या पहिल्याच दिवशी तिच्या कथित प्रियकर राज आणि इतर तिघांनी हे देखील कबूल केले की सोनम बुरखा घालून मेघालयातून पळून गेली होती. नंतर टॅक्सी, बस आणि ट्रेनने ती मध्य प्रदेशातील इंदूरला पोहोचली होती.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Ahmedabad Plane Crash: 'विमानाचा अपघात होणार..', तिची भविष्यवाणी खरी ठरली, ट्वीट व्हायरल

आरोपींनी सुपारीचे दिले होते 50,000 रुपये
पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विवेक सायम यांनी सांगितले की, राजाच्या हत्येचा कट 11 मे रोजी रचला गेला.  सोनमया लग्नापूर्वीच इंदूरमध्ये हा कट केला गेला. याचा सूत्रधार राज कुशवाह आहे. तर सोनमने या कटासाठी संमती दिली होती. पोलिस अधीक्षक विवेक सायम म्हणाले, हत्या करणारे ते तिघे तरुण मित्र होते.  त्यापैकी एक राजचा चुलत भाऊ आहे. हे हत्येची सुपारी देण्याचे प्रकरण नाही. पण हत्येची योजना होती.  त्यांनी त्यांचा मित्र राजला मदत करण्यासाठी हे केले.' पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, राजने त्यांना खर्चासाठी 50,000 रुपये दिले होते.

ट्रेंडिंग बातमी - Sunjay Kapur and Karishma Kapoor : संजय कपूरवरील करिश्माच्या आरोपांनी देश हादरला होता, रणधीर कपूर यांनी म्हटले होते थर्ड क्लास

मेघालयात हनिमूनदरम्यान हत्या
सोनमला मेघालयात हनिमूनदरम्यान तिचा पती राजा रघुवंशी (29) च्या कट रचून केलेल्या हत्येमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सोनमवर आरोप आहे की तिने तिचा कथित प्रियकर राज कुशवाह (20) सोबत मिळून तीन भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणली, जेणेकरून त्याला मार्गातून हटवता येईल. राजा रघुवंशी हत्याकांडातील सर्व पाच आरोपी सध्या मेघालय पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी करून या घटनेतील धागेदोरे जोडले जात आहेत. राजा आणि सोनम 23 मे रोजी मेघालयमध्ये हनिमूनसाठी आले होते. त्यानंतर ते गायब झाले. पुढे राजाचा मृतदेह 2 जून रोजी एका खड्ड्यात सापडला होता.