Weather News: मे महिन्यात उष्णतेचा तडाखा कमी होणार, पण 'ही' गोष्ट टेन्शन वाढवणार, कसं असेल मेचं तापमान?

हे अनुभव कायम राहतील. मात्र, उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याने एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात असेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मार्च आणि एप्रिल महिन्यांत मुंबईत उष्णतेची तीव्र लाट जाणवली असून नागरिकांना त्याचा त्रास झाला होता
  • मे महिन्यात हवामान विभागानुसार तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहून किंचित घट होण्याची शक्यता आहे
  • वाढत्या आर्द्रतेमुळे शरीरावर घामाच्या स्वरूपात त्रास होईल आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

मार्च आणि एप्रिल महिन्यांत मुंबईकरांनी उष्णतेची तीव्र लाट अनुभवली. या दोन महिन्यात उष्णतेमुळे सर्वांचीच भंबेरी उडाली. सर्व जण उन्हाने हैराण झाले होते. त्यामुळे मे महिन्यात काय होणार याचीच चिंता सर्वांना लागली होती. आता मे महिन्याच्या सुरुवातीला हवामान विभागाने तापमानाबाबतचे काही अंदाज व्यक्त केले आहेत.  नागरिकांसाठी काहीसा दिलासादायक अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या महिन्यात तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून, कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते. हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांच्या मते, मागील दोन महिन्यांच्या तुलनेत मे महिन्यातील वातावरण काहीसे सौम्य असेल.

तापमान कमी होणार असले तरी, हवेतील आर्द्रता (Humidity) वाढणार आहे. त्यामुळे उकाडा थेट जाणवण्याऐवजी घामाच्या स्वरूपात शरीराला त्रास देईल. वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकर चिंब होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेची शक्यता सध्यातरी कमी असली, तरी आर्द्रतेमुळे उकाड्याचे प्रमाण कायम राहील. तापमान कमी होणार असले तरी, वातावरणातील वाढती आर्द्रता मुंबईकरांची कसोटी पाहणार आहे. आर्द्रता वाढल्यामुळे प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारांनी मुंबईकर पुन्हा एकदा हैराण होतील. एप्रिलच्या उष्णतेच्या लाटेच्या तुलनेत हे तापमान सौम्य असले, तरी आर्द्रतेमुळे मिळणारा त्रास कमी असणार नाही.

Advertisement

नक्की वाचा - Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं, लुक अन् संगीताची एकच चर्चा, Video पाहून सर्व जण म्हणत आहेत...

नैसर्गिक प्रक्रियेनुसार, एप्रिल आणि मे महिन्यात भारतीय उपखंडातील वाढते तापमान हे मान्सूनसाठी पोषक ठरते. या उष्णतेमुळे हवेच्या दाबात बदल होऊन दक्षिण-पश्चिम मान्सून भारताकडे खेचला जातो. त्यामुळे ही उष्णता मान्सूनच्या आगमनाची एक आवश्यक प्रक्रिया मानली जाते. हवामान अभ्यासकांच्या मते, ही प्रक्रिया मान्सूनसाठी महत्त्वाची आहे. या महिन्यातील उष्णतेमुळेच हवेच्या दाबात फरक पडतो आणि मान्सून वारे भारतात प्रवेश करण्यासाठी मार्ग मोकळा होतो. त्यामुळे मे महिन्यातील उकाडा हा मान्सूनच्या आगमनाचा एक भाग असल्याचे स्पष्ट होत आहे.

नक्की वाचा - IPL 2026: मुंबईचे IPL मधून पॅकअप! चेन्नईने धुळ चारली; आता कसं असेल प्लेऑफचे समीकरण?

मुंबईवरचे उन्हाचे संकट आता हळूहळू निवळताना दिसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात मुंबईचे तापमान कमी होऊन 34 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत येण्याची शक्यता आहे. मार्च-एप्रिलच्या तुलनेत आता उन्हाची दाहकता कमी होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. तापमान 36 अंशांच्या खाली येत असले तरी, आर्द्रतेच्या प्रमाणामुळे मुंबईकरांना दमट हवेचा सामना करावा लागेल. यामुळे शरीरातून घामाच्या धारा वाहणे आणि प्रचंड उकाडा जाणवणे, हे अनुभव कायम राहतील. मात्र, उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याने एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात असेल.