Shubhman Gill: एक सामना अन् 5 महारेकॉर्ड मोडण्याची संधी! कर्णधार शुभमन गिल रचणार नवा इतिहास

Shubhman Gill New Record Alert: उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय कर्णधार शुभमन गिलची बॅट तळपली आली तर तो तीन महारेकॉर्ड्स करु शकतो. 

जाहिरात
Read Time: 2 mins

5 Big Records That Shubman Gill Can Break In The Lord's Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज (10 जुलै 2025) सुरू होत आहे. दोन्ही संघांमधील हा बहुप्रतिक्षित सामना लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता खेळला जाईल. येथे उत्तम फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय कर्णधार शुभमन गिलची बॅट तळपली आली तर तो तीन महारेकॉर्ड्स करु शकतो. 

( नक्की वाचा :  Shubman Gill : शुबमन गिलनं घडवला इतिहास, विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड मोडला! )

 कर्णधार म्हणून सलग तीन शतके झळकावण्याची संधी..

पहिले दोन कसोटी सामने लीड्स आणि एजबॅस्टन येथे खेळले गेले आहेत. या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये गिलची कामगिरी अव्वल दर्जाची होती. तिसरा सामना लॉर्ड्स येथे खेळला जाईल. जर येथेही त्याच्या बॅटमधून शतक निघाले तर तो भारतीय संघाकडून सलग तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावणारा पहिला कर्णधार बनेल.

कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याची संधी
गिलने चालू मालिकेत दोन सामने खेळले आहेत. दरम्यान, चार डावांमध्ये त्याच्या बॅटमधून 585 धावा निघाल्या आहेत. जर त्याने आगामी सामन्यांमध्ये आणखी 148 धावा केल्या तर तो भारतीय संघाचा कर्णधार म्हणून मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज बनेल. सध्या हा खास विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. 1978-79 मध्ये त्यांनी 6 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून 732 धावा केल्या.

भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम

सध्या इंग्लंडच्या भूमीवर एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या नावावर आहे. 2002 च्या दौऱ्यात त्याने 4 सामन्यांमध्ये 602 धावा केल्या. जर गिलने लॉर्ड्सवर 18 धावा केल्या तर तो देशासाठी इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू बनेल.

Advertisement

IND vs ENG: लॉर्ड्स टेस्टमध्ये इतिहास घडणार! 4 भारतीय खेळाडूंची महारेकॉर्डवर नजर

लॉर्ड्सवर टीम इंडियाकडून फक्त काही कर्णधारांना विजय मिळवता आला आहे. ज्यामध्ये कपिल देव, एमएस धोनी आणि विराट कोहली यांची नावे आहेत. शुभमन गिलकडेही सुवर्णसंधी आहे. जर त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जिंकली तर तो देशाचा चौथा कर्णधार बनेल. ज्याने लॉर्ड्सवर टीम इंडियाला कसोटी विजय मिळवून दिला आहे.

इंग्लंडमध्ये अनेक कसोटी जिंकण्याचा विक्रम

इंग्लंडच्या भूमीवर आतापर्यंत भारताचे फक्त सात कर्णधार झाले आहेत. ज्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली टीमला विजय मिळवून दिला आहे. यात मनोरंजक गोष्ट अशी आहे की कपिल देव आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकापेक्षा जास्त सामने जिंकले आहेत. जर गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला या दौऱ्यात अधिक विजय मिळाले तर तो कपिल देव आणि विराट कोहलीच्या खास क्लबमध्ये सामील होईल.

Advertisement