MI vs PBKS: IPL क्वालीफायर-2 चे गणित! रिझर्व्ह डे नाही, पाऊस झाल्यास 'या' संघाला मिळणार फायनलचे तिकीट

आयपीएलच्या नियमानुसार, जर पावसाच्या अडथळ्यामुळे प्लेऑफचा कोणताही सामना रद्द झाला, तर...

जाहिरात
Read Time: 2 mins

आयपीएल 2025 आता अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धेतील दुसरा क्वालिफायर सामना आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.तिथे जो संघ जिंकेल, त्याला फायनलमध्ये प्रवेश मिळेल. तर, पराभूत होणाऱ्या संघ स्पर्धेबाहेर पडेल. पण पावसामुळे सगळीच गणितं बिघडली आहेत. जर पाऊस असाच सुरू राहीला आणि सामना होवू शकला नाही तर कोणता संघ फायनलमध्ये जाणार याची क्रिकेट रसीकांना उत्सुकता आहे. नियम काय सांगतात हे आपण पाहाणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पावसाने सामना रद्द झाल्यास, कोणाला मिळेल फायनलचे तिकीट?
देशातील अनेक भागातून तुरळक पावसाच्या बातम्या येत आहेत. केरळमध्ये तर आठ दिवसांपूर्वीच मान्सूनने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना भीती वाटत आहे की, जर आजच्या सामन्यातही पाऊस आला आणि सामन्याचा निकाल लागला नाही, तर कोणत्या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळेल?  तुमचाही हाच प्रश्न असेल, तर त्याचे उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. त्याचं कारण ही तसेच आहे सामन्या आधी अहमदाबादमध्ये पाऊस होत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, क्वालिफायर-2 मध्ये 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष

आयपीएलच्या नियमानुसार, जर पावसाच्या अडथळ्यामुळे प्लेऑफचा कोणताही सामना रद्द झाला, तर लीग टप्प्यात उत्कृष्ट प्रदर्शन करून गुणतालिकेत पुढे असलेल्या संघाला प्राधान्य दिले जाईल. उदाहरणार्थ, जर आजचा सामना पावसा मुळे होवू शकला नाही तर पंजाब किंग्स संघाला फायनलचे तिकीट मिळेल. कारण लीग टप्प्यात उत्कृष्ट प्रदर्शन करून पंजाब 19 पॉईंट्स मिळवून  गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. तर मुंबई 16  पॉईंट्ससह चौथ्या स्थानावर होता.

ट्रेंडिंग बातमी - Political News: सुप्रिम कोर्टाचा दणका! 'ते' दोन टेंडर झाले रद्द, शिंदेंचे टेन्शन वाढणार?

क्वालिफायर-2 साठी अतिरिक्त वेळेचीही व्यवस्था
मोठ्या सामन्यांसाठी नेहमीच काही वेगळे नियम असतात. या वेळीही बोर्डाने क्वालिफायर-2 साठी अतिरिक्त वेळेची व्यवस्था केली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केल्यास, सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ ठेवण्यात आला आहे. बोर्डाकडून अतिरिक्त वेळेची मर्यादा 120 मिनिटे म्हणजेच पूर्ण दोन तास ठेवण्यात आली आहे. या वेळेतही सामना पूर्ण न झाल्यास, सामना रद्द घोषित केला जाईल आणि गुणतालिकेत पुढे असलेल्या संघाला फायनलचे तिकीट दिले जाईल. सामन्यासाठी रिझर्व्ह डेची कोणतीही तरतूद नाही.

Advertisement