
इंदूरमधील राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi Murder Case) हत्या प्रकरणाची सध्या देशभर चर्चा आहे. राजाची त्याची पत्नी सोनमनं लग्नानंतर काही दिवसांनीच हत्या केली. सोनमनं राजाला हनीमूनसाठी मेघालयला नेलं. तिथं भाडोत्री गुंडांना सुपारी देऊन राजाची हत्या केली. या प्रकरणात सोनमला तिचा प्रियकर राज रघुवंशीची मदत होती. असं पोलीस तपासामध्ये उघड झालं आहे. राजा रघुवंशी हत्येचा तपास सुरु असतानाच देशाच्या दुसऱ्या भागात आणखी एक त्याच पद्धतीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. करनूलमध्ये एका महिलेने लग्नाच्या अवघ्या एका महिन्यातच आपल्या पतीची हत्या घडवून आणली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकरालाही अटक केली आहे. तिरुमल राव असं त्याचं नाव आहे. तो बँक मॅनेजर असून विवाहित आहे. यामधील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे तिरुमलचे ऐश्वर्या आणि त्याच्या आईसोबतही प्रेमसंबंध होते. त्यांनी मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी ऐश्वर्याचया नवऱ्याची हत्या केली.
( नक्की वाचा : तौफिकनं नेहाला गच्चीवरुन का फेकलं? बुरखा घालून का लपला ? प्रत्येक गोष्टीचा झाला खुलासा )
ऐश्वर्या असं या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव आहे. ऐश्वर्यानं लग्नानंतर एका महिन्याच्या आतच तिच्या पतीची हत्या करवून घेतली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या आणि तिचा प्रियकर तिरुमल राव यांनी 2000 हून अधिक वेळा फोनवर संवाद साधला होता. ऐश्वर्याचे लग्न 18 मे 2025 रोजी तेजेश्वरसोबत झाले होते आणि 17 जून रोजी तेजेश्वरची हत्या झाली. भाडोत्री मारेकऱ्यांनी तिरुमल रावला तेजेश्वरचा मृतदेह दाखवला आणि नंतर तो कालव्यात फेकून दिला.
बँक मॅनेजरनं या हत्येसाठी लोन अॅप्लिकेशनचा (Loan Application) वापर केला होता. त्यानं भाडोत्री मारेकऱ्यांना हत्येसाठी 2 लाख रुपये आगाऊ दिले होते. माहितीनुसार, बँक मॅनेजरचे ऐश्वर्या आणि तिच्या आई या दोघींसोबत प्रेमसंबंध होते. तिरुमल रावचे लग्न 8 वर्षांपूर्वी झाले होते, परंतु त्याला मूलबाळ नाही.
( नक्की वाचा : Love Story : होणाऱ्या सुनेसोबत पळून जाऊन सासऱ्यानं केलं लग्न, रात्रीच्या Video कॉलमध्ये आले जवळ )
यापूर्वी तिरुमल रावला आपल्या पत्नीला मारून टाकायचे होते, पण त्याने तसे केले नाही. ऐश्वर्याचा पती तेजेश्वर (25 वर्ष) तेलंगणातील गडवाल येथे भूमी सर्वेक्ष होता. त्याचा मृतदेह कुरनूल जिल्ह्यातील पनयम येथे सापडला. तेजेश्वर १७ जून रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 21 जून रोजी त्याच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस करून त्याचा मृतदेह शोधण्यात आला.
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमधून कळाले की तेजेश्वर कारमधून कुरनूलला गेला होता. मारेकरी त्याला आपल्यासोबत कुरनूलला घेऊन गेले होते. तिथे जमिनीचं सर्वेक्षण करायचं आहे, असं त्यांनी तेजेश्वरला सांगितलं होतं. तेजेश्वरच्या हत्येनंतर कुटुंबाला ऐश्वर्यावर हत्येचा संशय आला कारण त्यांनी तिच्या प्रेमसंबंधांच्या अफवा ऐकली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world