आंध्रप्रदेश: आंध्रप्रदेशमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी भयंकर घटना समोर आली आहे. आंध्रप्रदेशच्या तिरुपती येथे एका आदिवासी महिलेने 25 हजारांचे कर्ज न फेडता आल्याने तिच्या मुलाला गहाण ठेवले होते. मात्र जेव्हा ती पैसे घेऊन कर्ज फेडायला अन् मुलाला सोडवायला गेली तेव्हा तिच्या पायाखालची वाळू सरकली कारण आरोपीने तिच्या मुलाची हत्या करुन पुरले होते. या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे संपूर्ण प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, अंकम्मा, तिचा नवरा चेनचैया आणि त्यांची तीन मुले यानाडी आदिवासी समुदायातील आहेत. ते तिरुपतीमध्ये एका बदकपालकाकडे एक वर्ष काम करत होते. चेंचैया मरण पावल्यानंतर मालकाने अंकम्मा आणि तिच्या तीन मुलांना जबरदस्तीने त्याच्याकडे काम करायला लावले. कारण तिच्या पतीने त्याच्याकडून 25,000 रुपयांचे कर्ज घेतले असल्याने ते जाऊ शकत नाहीत असे सांगितले.
यावेळी अंकम्मा आणि तिन्ही मुलांना खूप जास्त तास काम करायला लावले गेले आणि जास्त वेतन मिळावे अशी विनंती केली, परंतु बदक पालन करणाऱ्याने नकार दिला. जेव्हा तिने जाण्याचा आग्रह धरला तेव्हा त्याने कर्ज फेडण्यासाठी ४५,००० रुपये (२०,००० रुपये व्याजासह) मागितले. त्यांनी हे पैसे देण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितली. त्यावेळी त्या मालकाने तिच्या एका मुलाला तारण म्हणून सोडावे लागेल, असा प्रस्ताव सोडला. पर्याय नसल्याने तिने महिलेनेही त्याला होकार दिला.
नक्की वाचा - Solapur Crime : 9 वर्षांच्या चिमुरडीला शेतात पुरलं, मुलीचे वडील चौकशीच्या फेऱ्यात
अंकम्मा अधूनमधून तिच्या मुलाशी फोनवर बोलत असे आणि प्रत्येक वेळी तो तिला खूप काम करत असल्याचे सांगून त्याला घेऊन जाण्याची विनंती करायचा. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अंकम्माने पैशांची व्यवस्था केली आणि बदकपालकाशी संपर्क साधला आणि त्याला सांगितले की ती तिच्या मुलाला घेऊन जाणार आहे. त्या माणसाने सुरुवातीला त्याला सांगितले की मुलाला दुसरीकडे कुठेतरी पाठवण्यात आले आहे. जेव्हा तिने त्याच्याकडे तपशील मागितला तेव्हा त्याने सांगितले की मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि शेवटी तो पळून गेला होता. आपल्या मुलाला काही होऊ शकते या भीतीने अंकम्माने काही आदिवासी समुदायाच्या नेत्यांच्या मदतीने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला.
तिरुपतीचे कलेक्टर काय म्हणाले?
पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आणि चौकशी केली असता मालकाने मुलाची हत्या केल्याचे आणि कांचीपुरममध्ये गुप्तपणे मृतदेह पुरल्याचे कबुल केले. त्यानंतर व्यक्तीला त्याच्या पत्नीला आणि त्याच्या मुलाला ताबडतोब अटक करण्यात आली आणि सोमवारी बंधपत्रित कामगार व्यवस्था (निर्मूलन) कायदा, बाल कामगार कायदा, बाल न्याय कायदा, अनुसूचित जाती/जमाती अत्याचार कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदन तपासणी सुरू आहे.