Big Breaking: आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांची घरात घुसून हत्या

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांची नक्षलवाद्यांनी घरात घुसू निर्घृण हत्या केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातून नक्षलवाद्यांच्या भ्याड कृत्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांची नक्षलवाद्यांनी घरात घुसू निर्घृण हत्या केली आहे. छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा क्रूरता दाखवली आहे. त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या तीन नातेवाईकांची हत्या केली आहे. त्याचबरोबर 7 जणांना बेदम मारहाण केली आहे. याशिवाय नक्षलवाद्यांनी 12 हून अधिक गावकऱ्यांना ओलीस ठेवले आहे. नक्षलवाद्यांच्या या भ्याड कृत्यामुळे गावातील इतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नक्षलवादी नेता दिनेश मोडियम याने नुकतेच आत्मसमर्पण केले होते. त्याच्याच  नातेवाईकांना नक्षलवाद्यांनी लक्ष्य करत त्यांना घरात घुसून गोळ्या घातल्या आहेत. यामाने नक्षलवादी नेता वेल्ला असल्याचे सांगितले जात आहे. विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी याची माहिती दिली आहे. शिवाय घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

झिंगू मोडियम, सोमा मोडियम आणि अनिल माडवी अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय, नक्षलवाद्यांनी 7 गावकऱ्यांनाही बेदम मारहाण करून जखमी केले आहे. याशिवाय नक्षलवाद्यांनी सुमारे एक डझन ग्रामस्थांचे अपहरण केल्याचे सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी मारलेले दोन गावकरी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेता दिनेश मोडियमचे नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी संध्याकाळी 4 वाजता नक्षलवादी नेता वेल्ला आणि त्याच्या टीमने हा हल्ला घडवून आणला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी

केंद्र सरकार छत्तीसगडशिवाय देशातील इतर भागातून नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोहिमही राबवली जात आहे. नुकत्याच अनेक चकमकीही झाल्या आहेत, ज्यात अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. यामध्ये मओठी बक्षीसं असलेले नक्षलवाद्यांचा ही सहभाग आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Sonam Raghuvanshi: सोनमनं दिला राजाचा नरबळी? राजा रघुवंशी हत्या प्रकरणात तंत्र-मंत्रचा अँगल

राज्य सरकार नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करत आहे. यासाठी छत्तीसगड सरकार नवीन पुनर्वसन धोरणही घेऊन आले आहे. छत्तीसगडच्या नक्षलवाद निर्मूलन धोरणामुळे आणि नियद नेल्लानार योजनेमुळे अनेक माओवादी आत्मसमर्पण करत आहेत. ही योजना नक्षलग्रस्त भागांमध्ये शांतता आणि विकासाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना विविध सुविधा पुरवल्या जातात, जसे की पुनर्वसन, रोजगार आणि शिक्षण दिले जात आहे.  याशिवाय, नक्षलवादी हिंसाचाराने प्रभावित लोकांसाठीही मदत आणि पुनर्वसनाची व्यवस्था केली जाते. ही योजना माओवाद्यांना आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. परिणामी अनेक माओवादी आत्मसमर्पण करत आहेत आणि समाजात शांततापूर्ण जीवन जगण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत.
 

Advertisement