15 लाखांची गर्दी, 5 मृत्यू, शेकडो रुग्णालयात; चेन्नईत वायुसैन्याच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीचं कारण काय?

भारतीय वायुसैन्याच्या (Air Force) 92 व्या वर्षपूर्तीनिमित्ताने चेन्नईच्या मरीना बिचवर एका एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं.

Advertisement
Read Time: 2 mins
चेन्नई:

भारतीय वायुसैन्याच्या (Air Force) 92 व्या वर्षपूर्तीनिमित्ताने चेन्नईच्या मरीना बिचवर एका एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. एअर शो पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी येथे एकच गोंधळ उडाला. गर्दी मोठी असल्याने व्यवस्थापन करणं कठीण झालं होतं. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय 200 हून जणं बेशुद्ध झाले होते. त्यामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. हा एअर शो पाहण्यासाठी तमिळनाडूतील इतर शहरांमधून मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करून आले होते. एअर शो पाहण्यासाठी आलेल्या तिघांचा  भीषण उन्हाळा आणि डिहायड्रेशनमुळे मृत्यू झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

विरोधी पक्षनेता आणि AIADMK चे प्रमुख पलानीस्वामी यांनी या घटनेवरुन डीएमके सरकारवर टीका केली आहे. या  कार्यक्रमासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती असाही आरोप त्यांनी केला आहे. डिफेंस रिलीजनुसार, या कार्यक्रमात 15 लाखांहून अधिक लोक उपस्थित होते.  वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांना कमीत कमी दोन ते तीन तास कडक उन्हात उभं राहावं लागलं होतं.

नक्की वाचा - Rain Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; महाराष्ट्रात कधीपर्यंत बरसणार? जाणून घ्या तारीख 

एअर शोचं आयोजन सकाळी 11 ते दुपारी 1 यादरम्यान करण्यात आलं होतं. मोठी गर्दी आणि उकाड्यामुळे कार्यक्रमादरम्यान अनेकजणं बेशुद्ध पडले होते. एअर शो संपल्यानंतर मरीन बीच आणि त्याच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी जाली. बस, एमआरटीएस आणि मेट्रोसह स्थानिक ट्रेन खचाखच भरली. प्लॅटफॉर्मवर उभं राहणंही लोकांना कठीण झालं. एअर शो जवळील अण्णा स्क्वेअरवरील बस स्टॉपवर लोकांची मोठी गर्दी झाली होती.