जाहिरात

अत्यंविधीवरून परतणाऱ्यांवरच काळाचा घाला, ट्रकने 5 जणांना चिरडले

अहमदनगरकडून हा ट्रक कल्याणच्या दिशेने चालला होता. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकींना या ट्रकने धडक दिली.

अत्यंविधीवरून परतणाऱ्यांवरच काळाचा घाला, ट्रकने 5 जणांना चिरडले
अहमदनगर:

नगर कल्याण महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका भरधाव ट्रकने अनेकांना चिरडले आहे. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अहमदनगरकडून हा ट्रक कल्याणच्या दिशेने चालला होता. ट्रकने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकींना या ट्रकने धडक दिली. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. तर ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण अहमदनगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे हा भीषण अपघात झाला. अंत्यविधीवरून लोकं घरी परतत होते. त्याच वेळी नगरकडून कल्याण दिशेला एक ट्रक भरधाव चालला होता. लोकांना काही कळण्या आत त्या ट्रकने आधी चारचाकी, दुचाकीला धडक दिली. त्यानंतर रस्त्यावरील लोकांनाही चिरडलं. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना बेल्हे सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात भयंकर असल्याने मृतांचा आकाडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

ट्रेंडिंग बातमी -  एसटी चालवताना चालकाला आली फिट, गाडीवरचा ताबा सुटला अन्...

अपघात झाला ते ठिकाण उतारावरचे आहे. इथून कल्याणला जाणारा घाट सुरू होतो. त्याच वेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा अपघात झाला. अपघातानंतर एकच धावपळ झाली. ट्रक चालकाने तिथून पळ काढला. त्याचा ट्रक आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Puja Khedkar : पूजा खेडकरचा खेळ खल्लास, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
अत्यंविधीवरून परतणाऱ्यांवरच काळाचा घाला, ट्रकने 5 जणांना चिरडले
Bulandshahr Sadar MLA Pradeep Chaudhary becomes victim of cyber fraud, withdraws money from credit card without OTP
Next Article
'Hello मी बँकेतून बोलतोय...' एक कॉल अन् भाजप आमदाराच्या खात्यातून लाखो रूपये फुर्रर्रर्र