प्रेमात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. शिवाय प्रेम हे अंधळं असतं. पण ज्या वेळी डोळे उघडतात त्यावेळी हेच प्रेम नकोसे वाटते. समाजात अशा अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. पण त्यातून काही शिकण्या ऐवजी तशाचा चुका ही केल्या जातात. त्यामुळे ना घर का ना घाट का अशी अवस्था काहींची होते. पदरी प्रेम पडण्या ऐवडी पश्चातापा शिवाय काहीच पडत नाही. त्यामुळे आपण प्रेम करताना सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. पण तसं होताना दिसत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार बिहारमध्ये समोर आला आहे. या प्रकरणाने तर सर्वच जण आवाक झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एक महिला गावात आपला संसार करत होती. लग्न झालं होतं. एक साडेचार वर्षाची मुलगी ही तिला होती. घर कुटुंबं चालावं म्हणून पती कोलकात्यात कामाला होता. त्याच वेळी सर्व चक्र फिरली. पती घरात नव्हात. ही विवाहीता घरी एकटीत होती. वेळ जावा म्हणून फेसबूकला ती चिकटली. त्याच वेळी एक तरूण तिला फेसबूकवर मिळाला. ही विवाहीत महिला त्याच्या पेक्षा वयाने मोठी होती. जो तरुण तिच्या संपर्कात आला होता तो इयत्ता 12 वी शिकत होता.
पण प्रेमाला वय, जात, धर्म, पंत काही नसतो. तसचं या विवाहीतेचं झालं. फेसबूकवर मैत्री झाली. बोलणं वाढलं. त्यातून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. हे सर्व एक वर्षभर सुरू होतं. पती तिकडे कोलकात्यात घर चालवण्यासाठी पैसे कमवत होता. आणि पत्नी एकडे एका 12 वीच्या विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली होती. प्रेमात रंग भरत होते. दोघेही कुणाचीही परवा न करता प्रेमात अगदी बुडून गेले होते. शेवटी याची खबर तिच्या पतीला लागली. तो गावात आला, आणि सर्व काही बदलून गेलं.
प्रकरण पोलिस स्थानक आणि महिला हक्क समिती समोर गेले. 12 वीत शिकणाऱ्या मुलाने आपण या महिलेला ठेवायला तयार आहे असं सांगितलं. तसं लेखी ही दिलं. कसला ही विचार न करता ती विवाहीत महिला 12 वीला असलेल्या आपल्या प्रियकरा बरोबर निघून गेली. मागे साडे चार वर्षाची मुलगी ही पतीकडे सोडून गेली. पण प्रकरण इथेच संपलं नाही. खरं प्रकरण तर इथून पुढे सुरू झालं. काही दिवसांनी त्या 12 वी च्या विद्यार्थ्याने तिला सांभाळण्यास नकार दिला. प्रकरण पुन्हा महिला हक्क समितीच्या कार्यालयात पोहोचलं.
संबंधीत महिलेच्या पतीला ही त्या ठिकाणी बोलावलं गेलं. आपण तिला सांभाळणार नाही असं तिचा प्रियकर सांगत होता. ती रडत होती. पती आणि सासू तिच्या बाजूलाच उभी होती. शेवटी तिने आपल्या पतीचे पाय धरले. आपल्याला नांदवावे अशी याचना करू लागली. पण पतीन जीव गेला तरी चालेल तुला नांदवणार नाही. तुझा स्विकार करणार नाही. मरेन पण तुला ठेवणार नाही अशी थेट भूमीका घेतली. त्यामुळे त्या महिलेची अवस्था ना घर का ना घाट का झाली.