जाहिरात

Ranjangaon murder: आईसह 2 चिमुकल्यांना जाळलं, एका टॅटू मुळं खूनाचं कोडं उलगडलं, धक्कादायक खुलासा

मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे असल्याचं त्यावरू स्पष्ट झालं. ती 25 वर्षाची होती.

Ranjangaon murder: आईसह 2 चिमुकल्यांना जाळलं, एका टॅटू मुळं खूनाचं कोडं उलगडलं, धक्कादायक खुलासा
पुणे:

अविनाश पवार 

रांजणगावमध्ये दहा दिवसापूर्वी तिहेरी हत्याकांडानं खळबळ उडाली होती. इथं एका 25 वर्षाच्या महिलेसह तिच्या दोन चिमुकल्यांचा खून करून त्यांना जाळण्यात आलं होतं. त्यावेळी कुठलेही पुरावे आरोपीने मागे सोडले नव्हते. शिवाय या परिसरात सीसीटीव्ही ही नव्हते. त्यामुळे आरोपीला शोधण्याचे आव्हान पोलिसां समोर होते. महिलेची ही ओळख पटत नव्हती. त्यामुळे आणखीनच अडचणी येत होत्या. शेवटी एका टॅटू मुळे या खुनाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. जवळपास 10 दिवसानंतर  या तिहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कामगिरी करून दाखवली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हातात एकही पुरवा नव्हता 
या हत्याकांडामागे नात्याचे पाश आणि अनैतिक संबंधातून निर्माण झालेली कटुता कारणीभूत ठरली असल्याचं समोर आलं आहे. 25  मे रोजी पुणे-नगर महामार्गालगत रांजणगाव परिसरात एका बंद कंपनीच्या मागे एका महिलेचा व तिच्या दोन चिमुकल्या मुलांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतांची ओळख पटत नव्हती. ना घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा सापडत होता. दुर्गम भाग, सततचा पाऊस आणि सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. अशा वेळी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष 6 तपास पथकांची स्थापना केली. राज्यभरातील 33 पोलिस ठाण्यांतील अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, आशा वर्कर्स, आरोग्य सेविका यांच्या मदतीने सुमारे 16,500 भाडेकरूंना विचारपूस,250 सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्यात आले. 

ट्रेंडिंग बातमी - Raj and Uddhav Thackeray: अजबच आहे हे! आता जनता आठवली का ? मनसे नेत्याच्या विधानामुळे खळबळ

ओळख पटली टॅटूपासून
मृत महिलेच्या हातावर गोंदवलेले "जयभीम, राजरत्न, Mom-Dad, RS" या शब्दांवरून तपासाला दिशा मिळाली. तपास पथक बीड जिल्ह्यात पोहोचले. माजलगाव पोलिस ठाण्यातील एका महिला मिसिंग प्रकरणाशी ही माहिती जुळली. मृत महिलेचे नाव  स्वाती केशव सोनवणे असल्याचं त्यावरू स्पष्ट झालं. ती 25 वर्षाची होती. ती वाघोरा बीड इथली राहाणारी होती. तिचे  केशव सोनावणे याच्याबरोबर लग्न झाले होते. त्यांना स्वराज हा 2 वर्षाचा तर विराज हा 1 वर्षाचा मुलगा होता. पोलिसांनी या केशवची चौकशी केली. त्यात त्याने आपली आणि पत्नीची भांडणे असल्याचं सांगितलं. शिवाय ती आपल्या बरोबर राहात नसल्याचं ही त्याने सांगितलं. ती आता आपल्या आईवडीलां बरोबर आळंदीत राहात असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. 

ट्रेंडिंग बातमी - Raj and Uddhav Thackeray: अजबच आहे हे! आता जनता आठवली का ? मनसे नेत्याच्या विधानामुळे खळबळ

अनैतिक संबधाचा अँगल आला समोर 
स्वाती ही तिच्या पतीपासून दुरावली होती. त्यानंतर तिने गोरख पोपट बोखारे याच्या बरोबर जवळीक साधली. गोख हा ही आळंदीत राहाणारा होता. शिवाय तो नात्याने तिच्या बहीणीचा नवरा होता. ज्या ज्या वेळी स्वातीची तिच्या पती बरोबर भांडणं होत होती त्यावेळी हाच गोरख त्यांच्यात समेट करून देत होता. त्यातून या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. पुढे प्रेम निर्माण झाले. यातून त्यांच्यात अनैतिक संबंध ही निर्माण झाले. पुढे स्वातीने गोरखकडे लग्नाचा तगादा लावला. आपल्याबरोबर लग्न कर असं ती सतत त्याला सांगत होती. यातून त्याने तिच्या दोन चिमुकल्यांसह तिला ठार मारण्याचा अमानुष निर्णय घेतला. 

ट्रेंडिंग बातमी - Uddhav Raj News: 'हो आम्ही घाबरलोय'! ठाकरे एकत्र येणार यावर राणे थेट बोलले

पोलिसी खात्या अन् गुन्ह्याची कबूली 
पोलिसांनी या प्रकरणी गोरख पोपट बोखारे याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याने झालेली हकीगत पोलिसांना सांगितली. 23 मे रोजी त्याने त्याच्या दुचाकीवरून तिघांनाही आळंदीहून सरदवाडीकडे नेले. रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी गळा आवळून त्याने या तिघांना ही पहिले ठार केले. त्यानंतर दगडाने ही ठेचले. कोणता पुरावा मागे राहू नये म्हणून पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकले अशी कुबूली त्याने त्यानंतर दिली. या गुन्ह्याच्या उकलामध्ये अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, एसडीपीओ प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगावचे पोनि महादेव वाघमोडे यांच्यासह अनेक तपास अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com