राकेश गुडेकर
सध्या कोणात पावसाचा जोर आहे. अनेक ठिकाणी धुकं आहे. घाटात तर धुक्याची चादर आहे. त्यामुळे गाडी चालवताना चालकांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. त्यातून अपघात होण्याचा धोका ही वाढला आहे. अशातच रत्नागिरीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक कार जवळपास 400 फूट खोल दरीत कोसळली आहे. ही अपघात पहाटेच्या सुमारास घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कौत्सुभ विजय कुरूप हा राजापूरचा राहाणारा तरूण आहे. त्याचं वय 30 वर्ष आहे. तो आपल्या कारमधून अणूस्कुरा घाटातून प्रवास करत होता. हा घाट कोल्हापूर आणि राजापूरला जोडतो. सध्या या घाटात मोठ्या प्रमाणात धुकं आहे. पहाटेच्या सुमारास त्याच्या कारचा अपघात झाला. त्याची कार जवळपास 400 फूट खोल दरीत कोसळली. त्याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असवा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हा अपघात इतका भीषण होता की गाडीचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. कारचे इंजिन दरीतून घाटावरील रस्त्यावर येवून पडले होते. तर गाडी चावत असलेल्या कौस्तूभचा मृतदेह ओळखण्याच्या पलिकडे गेला होता. तो पुर्ण पणे विच्छिन्न अवस्थेत होता. या अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यानंतर खोल दरीतून काम काढण्याचं काम सुरू करण्यात आलं.
कौस्तुभ विजय कुरूप हा लांजा येथून सोमवारी मध्यरात्री निघाला होता. रात्री त्याच्या आईने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे घाबरलेल्या आईने लांजा पोलीस ठाण्यात कौस्तुभ बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. अणूस्कुरा घाटातील दाट धुक्यामुळे कौस्तुभला रस्त्याचा अंदाज आला नसावा आणि त्यामुळे त्याची कार थेट 400 फूट खोल दरीत कोसळली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात कौस्तुभ कारमधून बाहेर फेकला गेला. तो दगडांवर आदळत सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळला. रात्रीच्या वेळी मदत न मिळाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा.