आकाश सावंत
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. आरोपी वाल्मिक कराडने युक्तिवाद करताना आपण या हत्येच्या कटात सामील नसल्याचं सांगितलं. मात्र त्याच्या या युक्तिवादाला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी जोरदार विरोध केला. "कटाचा सूत्रधार अनेकदा पडद्यामागेच असतो. पुढे दिसणाऱ्या लोकांचा वापर करून गुन्हा घडवतो," असं स्पष्ट करत निकम यांनी आरोपी विरोधातील साक्षी-पुराव्यांची सविस्तर यादीच न्यायालयात मांडली. त्यामुळे आता हा खटला निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. पुढील सुनावणी 7 जुलैला होणार आहे. विशेष म्हणजे निकम यांनी सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, आरोपीचे सर्व प्रयत्न आम्ही कोर्टात फोल ठरवले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी पार पडली. तर पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात या खळबळजनक प्रकरणाची सुनावणी पार पडली. कोर्टात आरोपी वाल्मीक कराड यांच्या वकिलांकडून तब्बल दोन तास युक्तिवाद करण्यात आला. तर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी एक तास युक्तिवाद केला. मात्र आजची संपूर्ण सुनावणी फक्त दोषमुक्ती अर्जावरच केंद्रित होती. या खटल्यात मागील वेळी न्यायाधीश रजेवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आजच्या सुनावणीला स्वतः सरकारी वकील उज्वल निकम यांची कोर्टात प्रत्यक्ष उपस्थिती होते. यावेळी युक्तीवाद केल्यानंतर निकम यांनी स्पष्ट केलंय की, आम्ही आमचं प्रतिपादन केलं असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
तर वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव यांनी जवळपास 2 तास युक्तिवाद केला. या प्रकरणातील तीनही गुन्हे वेगवेगळे आहेत. प्रत्येक एफआयआरची वेगवेगळी चारशीट झाली पाहिजे. वाल्मीक कराडचा मकोकाशी काहीही संबंध नाही. त्यांचा गुन्हा आणि एफआयआर वेगळा आहे. सहा डिसेंबर रोजी वॉचमन सोनवणे याला मारहाण झाली. यात खंडणीचा कुठलाही संबंध नाही. शिवराज देशमुख हा मुख्य फिर्यादी आहे. त्याच्या जबाबात कराड यांचे नाव नाही. असं यादव यांनी कोर्टाला सांगितलं. 15/1/2025 रोजी कराड याला हत्या प्रकरणात आरोपी करण्यात आले. अण्णा म्हणजे वाल्मीक नव्हे संतोष देशमुख यांना देखील अण्णा बोलावले जात होते. केवळ अण्णा नावाने वाल्मीक कराडला आरोपी बनवण्यात आले आहे असा दावाही त्यांनी केला. कराडच्या वकिलाने घेण्यात आलेले जबाब न्यायालयासमोर मांडले. सीआयडीने मांडलेले हे त्यांचे मत आहे. यात पोलिसांचा तपास गरजेचा होता असं त्यांनी म्हटले.
वाल्मिक कराड यांच्या वकीलाच्या युक्तीवादावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. संपूर्ण केसचा हेलिकॉप आढाला घ्यावा असं ते म्हणाले. आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितली होती. या संपूर्ण केसमध्ये वाल्मीक कराड हा दिग्दर्शक आहे. जो पडद्या मागे राहून सर्व गोष्टी करत होता. संतोष देशमुख यांनी निकटवर्ती यांना सांगितले होते. यातील डिजिटल पुरावे पुरेसे आहेत. या घटनेनंतर कराड, चाटे अस्वस्थ झाले. त्यांनी नुसती मारामारी काय करता असा अप्रत्यक्षपणे संदेश दिला. सुदर्शन घुले हा गँग लीडर आहे. मात्र पडद्यामागे त्याचा सूत्रधार कराडच आहे. असा दावा निकम यांनी केला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला नाही तर तज्ञ सीआयडी टीमने केला आहे. या हत्येचा कंट्रोल कराडकडे होता. कोल्हापुरातही बाल हत्याकांड झालं होतं. त्यासारखेच इथं घडलं असल्याचं निकम म्हणाले.