जाहिरात

Explainer Borivali-Padgha : दहशतवादाचं 'पडघा मॉडेल' काय आहे? 'या' गावात पोलीस पथकही होतं निशाण्यावर

पडघा गाव ठराविक एका जमातीसाठी ‘स्वतंत्र क्षेत्र’ म्हणजेच सीरियाप्रमाणे ‘अल – शाम’ म्हणून घोषित करण्यात नाचणचा प्रयत्न असल्याचा संशय होता. पडघ्यातल्या स्थानिकांना तो दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण द्यायचा.

Explainer Borivali-Padgha : दहशतवादाचं 'पडघा मॉडेल' काय आहे? 'या' गावात पोलीस पथकही होतं निशाण्यावर

मुंबईहून नाशिकला जाताना वाटेत एक गाव लागतं. सध्या या गावामध्ये एटीएस काही गोष्टींचा शोध घेतंय. हा शोध घेताना या गावात काही हत्यारं मिळाली आहेत. काही संशयास्पद कागदपत्रं सापडली आहेत. हे गाव आहे साकिब नाचनचं गाव. साकिब नाचन म्हणजे आतापर्यंत ज्याला तीन वेळा दहशतवादी कारवायांसंदर्भात अटक झाली आहे. त्याच्या या गावाभोवती कायमच संशयाचं वातावरण राहिलंय. काय आहे हे पडघा मॉडेल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई-नाशिक हायवेवरचं भिवंडीजवळचं पडघा नावाचं गाव आहे. सुमारे आठ हजार लोकवस्ती असलेल्या या गावात शिरताच उर्दू पाट्या दिसू लागतात. आणि त्यावरुनच अंदाज येतो हे मुस्लीम बहुसंख्य गाव आहे. गावात जवळपास 97 टक्के मुस्लीम वस्ती आहे. देशात एखादी दहशतवादी हल्ल्याची घटना घडली की बऱ्याचवेळा तपासाची सुई याच पडघा बोरीवली गावात येऊन पोहोचते. हे गाव पूर्वी लाकडांच्या वखारींसाठी ओळखलं जायचं. 
भिवंडीप्रमाणे इथेही गोदामं उभी राहिली. त्यामुळे जमिनीला चांगला भाव आला. त्यामुळे पहिल्यापासूनच गावात पैसा खुळखुळता राहिला. मात्र मुंबईतल्या 1990 च्या दशकातल्या साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणात याच गावातल्या साकिब नाचनला अटक झाली. तेव्हापासून पडघा बोरीवलीची ओळख बदलली. 

Latest and Breaking News on NDTV

1970 मध्ये भिवंडी परिसरात दंगल झाली आणि त्यावेळी भिवंडीतल्या विविध भागांतून मुस्लीम नागरिकांनी याच पडघा बोरीवलीमध्ये स्थलांतर केलं. साकिब नाचण याच बोरीवली पडघा गावात जन्माला आला. आतापर्यंत साकिबला तीन वेळा अटक झाली आहे. 1990च्या दशकातल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी ‘टाडा' न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. पाच वर्षे तुरुंगात राहिल्यावर नाचणची सुटका झाली. पुन्हा 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी साकिबला अटक झाली. त्यावेळी तो ठाणे कारागृहात होता. नाचण याची वर्तणूक चांगली असल्यानं त्याची पाच महिने 13 दिवस आधीच सुटका केली होती. ठाणे कारागृहातून बाहेर पडताच, त्याला भेटण्यासाठी पडघ्यातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  

साकिबला जेव्हा अटक झाली, तेव्हा मार्च २००३ मध्ये प्रदीप शर्मा, दया नायक आणि सचिन वाझे हे तीन एन्काऊण्टर स्पेशालिस्ट साकिब नाचणला अटक करण्यासाठी पडघ्यात गेले होते. साकिबला पोलीस घेऊन जात असल्याचं कळताच ग्रामस्थ आक्रमक झाले. साकिबला पोलिसांच्या वाहनांमध्ये बसवल्यानंतर पोलिसांच्या पथकावर हल्ला झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी साकिबला पोलिसांच्या गाडीतून बाहेर काढले. त्यामुळे पोलीस पथक रिकाम्या हातानं गावातून परतलं होतं. काही दिवसांनी मात्र साकिब नाचण पोलिसांना शरण आला होता. 

Sunita Jamgade Nagpur : LOC ओलांडण्याचा सीन रिक्रिएट करणार, सुनीताला नेण्यासाठी लडाख पोलिसांची टीम नागपुरात

नक्की वाचा - Sunita Jamgade Nagpur : LOC ओलांडण्याचा सीन रिक्रिएट करणार, सुनीताला नेण्यासाठी लडाख पोलिसांची टीम नागपुरात

काय आहे पडघा मॉडेल?
2017 मध्ये साकिब नाचणची सुटका झाली. त्यानंतर तो पडघ्यामध्ये सक्रिय झाला आणि साकिबनं एक पडघा मॉडेल तयार केलं. साकिब नाचण हा बंदी असलेली दहशतवादी संघटना सिमीशी संबंधित होता. दहशतवादी संघटना आयसिसचे मोड्युल जसेच्या तसे पडघ्यात उभे करता येईल का याची चाचपणी नाचण करत होता. कट्टरतावादी विचारसरणीने साकिब नाचन स्थानिक तरुणांची माथी भडकवायचा. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना बयाथ म्हणजे ‘खलिफा'शी निष्ठेची शपथ दिली जायची. पडघा गाव ठराविक एका जमातीसाठी ‘स्वतंत्र क्षेत्र' म्हणजेच सीरियाप्रमाणे ‘अल – शाम' म्हणून घोषित करण्यात नाचणचा प्रयत्न असल्याचा संशय होता. पडघ्यातल्या स्थानिकांना तो दहशतवादी कारवायांचं प्रशिक्षण द्यायचा. दहशतवादी कारवायांसाठी स्थानिक पातळीवर छोटे गट तयार केले जायचे. गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करुन जास्तीत जास्त नुकसान आणि भीती निर्माण करायचा प्लान पडघ्यामध्ये आखला जायचा. भिवंडीतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोहन रायचनी यांच्या हत्येचाही नाचण याच्यावर आरोप होता.  

साकिब नाचन तुरुंगात मात्र हस्तक सक्रीय

२०२३ मध्ये साकिब नाचनला पुन्हा अटक झाली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. साकिब तुरुंगात असला तरी त्याचे हस्तक पडघ्यामध्ये सक्रिय असल्याचा आरोप आहे. त्यामुळेच साकीब नाचणच्या घरासह तीस ते पस्तीस घरांवर एटीएसनं छापे टाकले. या झडतीदरम्यान त्याच्या घरातून मोबाइल, तलवार, सुरा, मालमत्तेची संशयास्पद कागदपत्रं सापडली आहेत. साकिबचे काही नातेवाईक पंचायत समितीमध्ये सदस्यही असल्याची माहिती आहे. 
या गावात कुणाचाही मृत्यू झाल्यावर कब्रस्तानात दफन केलं जातं, मात्र त्यासाठी ग्रामपंचायतीतून परवानगी घेतली जात नाही.  या बोरीवली पडघा परिसरात गोवंश विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते, असं स्थानिक सांगतात. आता पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पडघा बोरीवली ATS च्या रडारवर आलं आहे. या छाप्यांमधून आणखी काय बाहेर येतंय, यावर लक्ष ठेवावं लागणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com