अभिषेक बच्चनची एक कृती आणि पुन्हा सुरु झाली ऐश्वर्यासोबतच्या मतभेदांची चर्चा

Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan: बॉलिवूडमधील 'पॉवर कपल' अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यात सर्व काही ठीक नसल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
A
मुंबई:

Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan: बॉलिवूडमधील 'पॉवर कपल' अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यात सर्व काही ठीक नसल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. या जोडप्याच्या रिलेशनशिप स्टेट्सवर अनेक दिवसांपासून कुजबूज सुरु आहे. त्यातच अभिषेक बच्चननं सोशल मीडियावर केलेल्या कृतीनं त्याला बळ देण्याचं काम केलंय.

अभिषेकनं इन्स्टाग्रामवर घटस्फोटाचा उल्लेख असलेली एक पोस्ट लाईक केली आहे. 'प्रेम सोपं का राहत नाही' या विषयावर या पोस्टमध्ये चर्चा करण्यात आलीय. विवाहित जोडपे वेगळे का होतायत? त्यांच्या या निर्णयाची कारणं काय आहेत? ग्रे घटस्फोट का वाढत आहेत? हे प्रश्न या पोस्टमध्ये विचारण्यात आले आहेत.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या पोस्टमध्ये लिहलं आहे की, ' कुणासाठीही घटस्फोट सोपा नसतो.  नेहमी सुखी राहण्याचं स्वप्न कोण पाहात नाही? एखादं वृद्ध जोडपं एकमेकांचा हात पकडून रस्ता पार करत आहे असा काळजाला भिडणारा व्हिडिओ तयार करावा असं कुणाला वाटत नाही? त्यानंतरही कधी-कधी आपल्याला हवं तसं आयुष्य नसतं. अनेक दशकं एकत्र राहिल्यानंतर वेगळं होणारी लोकं परिस्थितीचा सामना कसा करतात? आपल्या आयुष्यातील लहान-मोठ्या गोष्टींवर एकमेकांवर अवलंबून राहिल्यानंतरही एकमेकांशी संबंध तोडावे असं त्यांना का वाटतं? त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

अभिषेक बच्चननं जी पोस्ट लाईक केलीय त्यामध्ये पुढं लिहिलं आहे की, '50 वर्षांपेक्षा जास्त वयांच्या जोडप्यांमध्ये घटस्फोट घेण्याचं प्रमाण जगभरात वाढत आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण, आश्चर्यकारक नाही. 

Advertisement

( नक्की वाचा : अभिषेक बच्चननं मुंबईत खरेदी केले 6 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का )

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अफवा आहेत. या जोडप्यानं या चर्चेचा इन्कार किंवा स्विकार अद्याप केलेला नाही.