Panchayat Cast Fees: सचिव जी की मंजू देवी? 'पंचायत 4'साठी सर्वाधिक मानधन कुणाला? पाहा सर्व कलाकारांची फी

Panchayat Season 4 All Cast Fees: या सिरीजमधील कलाकारांना किती मानधन मिळाले? याबाबतही जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. जाणून घ्या या लोकप्रिय कलाकारांची फी.

जाहिरात
Read Time: 2 mins

Panchayat Season 4 Cast Fees:  ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय पंचायत या सिरीजच्या चौथ्या सिझनची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. आता तो प्रदर्शित झाला असून त्याला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. फुलेरा गावातील प्रत्येक व्यक्तिरेखेची आणि ग्रामपंचायत निवडणुकीची जोरदार चर्चा होत आहे. आता या सिरीजमधील कलाकारांना किती मानधन मिळाले? याबाबतही जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. जाणून घ्या या लोकप्रिय कलाकारांची फी.

पंचायतमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणजे अभिषेक त्रिपाठी (Abhishek Tripathi) म्हणजेच सचिवजींच्या भूमिकेतील जितेंद्र कुमार. सचिवजींच्या भूमिकेला जोरदार लोकप्रियता मिळत आहे. . जितेंद्र कुमार यांनी ही भूमिका खूप मेहनतीने साकारली आहे आणि लोकांनी त्यांना मनापासून पसंत केले आहे. त्यामुळेच ते या सिरीजमधील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार ठरलेत. 

Advertisement

(नक्की वाचा: Emergency मुळे ठाकूर करू शकला नाही गब्बरचा खात्मा)

जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) यांनी ही भूमिका खूप मेहनतीने साकारली आहे आणि लोकांनी त्यांना मनापासून पसंत केले आहे. असे म्हटले जात आहे की जितेंद्र कुमार यांना पंचायत सीझन 4 च्या प्रत्येक एपिसोडसाठी 70 हजार रुपये मिळत आहेत. म्हणजेच त्यांना सीझन 4 पासून एकूण साडेपाच लाख रुपये मिळतील. यानंतर मंजू देवी म्हणजेच नीना गुप्ता यांचा नंबर येतो. प्रधान यांच्या पत्नी म्हणजेच मंजू देवी (Manju Devi) यांच्या भूमिकेसाठी नीना गुप्ता यांना एका एपिसोडसाठी 50 हजार रुपये मिळत आहेत. त्यानंतर प्रधान जींची भूमिका करणाऱ्या रघुबीर यादव यांना प्रत्येक एपिसोडसाठी 40 हजार रुपये दिले जात आहेत.

Advertisement

प्रल्हाद चाचा आणि विकास यांना एवढे मानधन मिळाले. इतर कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, प्रल्हाद चाचाची भूमिका करणाऱ्या फैसल मलिकला एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 20 हजार रुपये दिले जात आहेत. त्याच वेळी, विकासची भूमिका करणाऱ्या चंदन रॉयलाही तेवढेच मानधन मिळत आहे. हे दोन्ही कलाकार पंचायतचे लोकप्रिय अभिनेते आहेत ज्यांच्या विनोदी आणि भावनिक भूमिका लोकांना आवडतात. पंचायतच्या प्रत्येक सीझनमध्ये विनोदासोबतच फुलेरा गावाचे साधे जीवन आणि कथा अनेक संदेश देते. विनोदासोबतच ही मालिका खऱ्या नातेसंबंधांनी आणि सामाजिक संदेशांनीही परिपूर्ण आहे.

Advertisement

(नक्की वाचा: शाहरूख खानच्या 'मन्नत' चा मार्ग मोकळा, BMC नं दिली मोठी परवानगी)