Shah Rukh Khan: शाहरुख पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला, घेतली मोठी जबाबदारी

शाहरुख खान व्यतिरिक्त आणखी कोण कोण पंजाबच्या पुरग्रस्तांसाठी पुढे आले?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पंजाबमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान ‘व्हॉइस ऑफ अमृतसर' (VOA) या संस्थेने मदतकार्याला गती दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मदत करणारी संस्था 'मीर फाऊंडेशन' देखील सहभागी झाली आहे. मीर फाऊंडेशन, जी देशभरात ॲसिड हल्ल्यातील पीडितांना मदत करण्यासाठी ओळखली जाते. शाहरुखची ही संस्था आता पंजाबमधील  500 पूरग्रस्त कुटुंबांना मदत करणार आहे. त्यांना लागणारी अंथरुणे, गाद्या, गॅस शेगडी, पंखे, पाणी शुद्ध करणारे यंत्र, कपडे आणि इतर घरगुती वस्तूंचे वाटप करणार आहे. 

या कुटुंबांना पुन्हा आत्मनिर्भर बनवणे हा या मागचा उद्देश आहे. याआधी, 'VOA' ने एम्स, नवी दिल्लीच्या डॉक्टरांच्या सहकार्याने गुरुद्वारा बाबा बुद्धा साहिब, रामदास, माचिवाडा आणि घनोवाला गावांमध्ये वैद्यकीय शिबिरे (medical camps) आयोजित केली. तिथे हजारो लोकांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे मिळाली. त्याचबरोबर, 'VOA' ने ‘विद्या का लंगर' सुरू करून मुलांना पुस्तके, वह्या आणि स्टेशनरी साहित्य देखील पुरवले.

नक्की वाचा - 'मी तर विधवा, तू तर नवऱ्याला सोडून गेली', करिश्मा कपूर अन् प्रिया कपूरमध्ये कोर्टात संपत्तीवरून घमासान

शाहरुख खान व्यतिरिक्त आणखी कोण कोण पुढे आले?

  • अक्षय कुमार याने 5 कोटी रुपयांची मदत दिली . याला त्याने ‘दान नाही, सेवा' असे म्हटले.
  • सलमान खान यांनी त्यांच्या ‘बीइंग ह्युमन' (Being Human) संस्थेमार्फत पाच विशेष बचाव बोटी पाठवल्या गेल्या. त्यापैकी तीन वापरल्या जात आहेत. त्यांनी पूरग्रस्त गावे दत्तक घेण्याचे वचनही दिले आहे.
  • सोनू सूद यांनी आपल्या कुटुंबासोबत मिळून  2,000 गावांमध्ये मदत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यात वैद्यकीय व्हॅन आणि हेल्पलाइनसह अनेक सुविधा सुरू केल्या आहेत.
  • दिलजीत दोसांझच्या ‘सांझ फाऊंडेशन' (Sanjh Foundation) ने अमृतसर आणि गुरुदासपूरमधील 10 गावे दत्तक घेतली आहेत. जिथे पहिल्या टप्प्यात अन्न, स्वच्छ पाणी, तेल आणि औषधे पोहोचवली गेली. नंतर ते पुन्हा बांधकाम देखील करतील.
  • राज कुंद्रा यांनी त्यांच्या ‘मेहर' (Mehar) चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिली.
  • करण औजला, गिप्पी ग्रेवाल, अममी विर्क, जसबीर जस्सी यांसारख्या पंजाबी कलाकारांनी अन्नधान्य, जनावरांसाठी चारा, निवारा आणि पुनर्बांधणीमध्ये सक्रिय भूमिका बजावली.