Sunjay Kapur Property : बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती आणि उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर, त्यांच्या बहीण मंदिरा कपूर यांनी रक्षाबंधनानिमित्त भावासाठी एक भावुक पण गूढ पोस्ट लिहिली आहे. त्यांनी स्वतःचा, संजयचा आणि आई राणी कपूर यांचा एक सुंदर फोटो शेअर करून लिहिले की, राखीच्या दिवशी त्यांना आणि त्यांच्या आईला संजयची खूप आठवण आली. इतकेच नाही, तर या पोस्टमध्ये मंदिराने संजय कपूर यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर 30,000 कोटी रुपयांच्या सोना कॉमस्टार मालमत्तेच्या उत्तराधिकारावरून सुरू असलेल्या वादाकडेही लक्ष वेधले.
संजय कपूर यांच्या बहिणीची गूढ पोस्ट
इंस्टाग्रामवर मंदिरा कपूरने स्वतःचा, भावाचा आणि आईचा फोटो शेअर करत लिहिले, "हे लिहायला मला दिवसभर लागला, कारण आजचा दिवस खूप कठीण होता. रक्षाबंधन संपल्यानंतर तुझ्या फोटोसमोर फुले ठेवताना मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते, पण आई रडत होती. जो धागा आपल्याला जोडतो, तो दिसत नसला तरी मजबूत आणि तुटता न येणारा आहे. आपल्या आठवणींप्रमाणेच तो चिरंतन आहे. मी तुझ्यासोबत घालवलेले क्षण पुन्हा जगत आहे आणि आता मी स्वतःला तुझ्या इच्छा आणि स्वप्नांचे रक्षण करताना पाहते. जर तू इथे असतास तर सगळे काही वेगळे झाले असते, सगळे काही चांगले झाले असते- माझ्या प्रिय दादा."
( नक्की वाचा : Sunjay Kapur : 30 हजार कोटी संपत्तीच्या वादात संजय कपूरच्या पत्नीचा मोठा निर्णय! )
या पोस्टच्या पुढे मंदिराने लिहिले, "आज मी तुझ्या फोटोच्या कोपऱ्यात एक धागा बांधत आहे. वडिलांचा वारसा तू पूर्ण ताकदीने पुढे नेलास, मला माहीत आहे की तू तो आणखी पुढे नेला असतास. तुझ्या आठवणींचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे, आम्ही शूर आहोत आणि मला माहीत आहे की तू आमचे रक्षण करत राहशील. रक्षाबंधन मला आठवण करून देते की प्रेम काळाच्या पलीकडचे आहे, आपले बंधन अतूट आहे आणि कायम एकमेकांशी जोडलेले आहे." मंदिराची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि संजयची पहिली पत्नी नंदिता महतानी यांनी यावर कमेंट करताना एक इमोजी (Red Heart Emoji) देखील दिला आहे.
4 वर्ष होतं बोलणं बंद
संजय कपूरच्या निधनानंतर, मंदिराने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने सांगितले होते की भावासोबत गेल्या 4 वर्षांपासून तिचे बोलणे बंद होते. मंदिराने लिहिले होते, "मी आणि माझा भाऊ गेल्या 4 वर्षांपासून बोललो नाही. अहंकार आणि स्वाभाविक उत्साहामुळे भाऊ-बहिणीमध्ये वाद झाला, जो वेडेपणाच्या हद्दीपर्यंत पोहोचला, तरीही, यामुळे तो परत येणार नाही, जे आपण होतो आणि जे आपल्याकडे होते. त्याने नेहमीच माझा आणि माझ्या बहिणीचा सांभाळ केला, एका खऱ्या मोठ्या भावाप्रमाणे आणि मित्राप्रमाणे."