जाहिरात

अहमदाबाद विमान अपघाताला 1 वर्ष पूर्ण; मृत्यूला हुलकावणी देणारा एकमेव प्रवासी आज कोणत्या वेदनेतून जातोय?

Ahmedabad Plane Crash 1 Year: 260 प्रवाशांचा बळी घेणाऱ्या या मृत्यूच्या तांडवातून विश्वास कुमार रमेश नावाचा एकमेव प्रवासी चमत्कारिकरीत्या जिवंत बाहेर आला होता.

अहमदाबाद विमान अपघाताला 1 वर्ष पूर्ण; मृत्यूला हुलकावणी देणारा एकमेव प्रवासी आज कोणत्या वेदनेतून जातोय?
Ahmedabad Plane Crash 1 Year: या अपघातामध्ये विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी वाचला.
मुंबई:

Ahmedabad Plane Crash 1 Year: अहमदाबादमध्ये एअर इंडिाच्या विमानाला झालेल्या त्या भीषण विमान अपघाताला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. 260 प्रवाशांचा बळी घेणाऱ्या या मृत्यूच्या तांडवातून विश्वास कुमार रमेश नावाचा एकमेव प्रवासी चमत्कारिकरीत्या जिवंत बाहेर आला होता. मात्र, आज 1 वर्षानंतरही हा एकमेव वाचकलेला प्रवासी नेमका कोणत्या परिस्थितीत आहे, हा प्रवास अत्यंत अस्वस्थ करणारा आणि तितकाच भावुक आहे.

अवघ्या 32 सेकंदांत होत्याचे नव्हते झाले

गेल्या वर्षी 12 जून 2025 रोजी एअर इंडियाच्या AI-171 या विमानाने दुपारी 1.38 वाजता उड्डाण केले होते. लंडनच्या दिशेने निघालेले हे विमान अवघ्या 32 सेकंदांत जमिनीच्या दिशेने कोसळले आणि एका मोठ्या धमाक्यासह आगीच्या गोळ्यात बदलले. लाखो लीटर इंधनामुळे भडकलेल्या आगीच्या ज्वालांमधून विश्वास कुमार रमेश जिवंत बाहेर आले. 

Latest and Breaking News on NDTV

विमानाचा अपघात होताच त्याचे दोन तुकडे झाले आणि सर्व काही जळून खाक होण्यापूर्वी विश्वास बाहेर पडण्यात यशस्वी ठरले. ते विमानातील विंग बॉक्सजवळ असलेल्या अत्यंत मजबूत भागातील 11A या सीटवर बसले होते. विमानाची बॉडी तुटल्यामुळे तिथे तयार झालेल्या एका फटीतून ते सरपटत बाहेर पडले, ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

( नक्की वाचा : Fact Check: तुमच्या खिशातील 100, 200, 500 रुपयांच्या नोटा बंद होणार? 30 जूनच्या तारखेचं RBI नं सांगितलं सत्य )

अपघाताचे कारण अजूनही अस्पष्ट

अपघातातून विश्वास कुमार रमेश सुखरूप बाहेर पडले असले, तरी त्यांच्या मनावर झालेले जखम आजही ताजे आहेत. या दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण होत आले तरी तपास यंत्रणांना अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करता आलेले नाही. प्राथमिक अहवालानुसार, उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाचे दोन्ही फ्युएल स्विच कट-ऑफ झाले होते, ज्यामुळे इंजिनचा इंधन पुरवठा थांबला होता. 

या अनसुलझलेल्या प्रश्नांवर बोलताना विश्वास यांनी सांगितले की, माझा त्रास त्या दिवशी संपला नाही. मी आजही गंभीर मानसिक आघात आणि माझ्या भावाला गमावल्याच्या दुःखात जगत आहे. हा अपघात कसा आणि का झाला, याची सत्यता जाणून घेण्याचा अधिकार पीडित कुटुंबांना आहे.

Latest and Breaking News on NDTV

सख्ख्या भावाला गमावल्याचे दुःख आणि मानसिक आघात

शारीरिक जखमांपेक्षा विश्वास यांना लागलेला मानसिक धक्का अत्यंत मोठा आहे. या अपघातात त्यांनी आपल्या सख्ख्या लहान भावाला म्हणजेच अजय कुमार रमेश यांना गमावले, जे 11J क्रमांकाच्या सीटवर बसले होते. डोळ्यांसमोर भाऊ आणि शेकडो प्रवाशांना मृत्यूच्या दारात जाताना पाहिल्यामुळे विश्वास यांना तीव्र मानसिक धक्का बसला आहे. 

ते सध्या एका वेगळ्याच अपराधी भावनेत (सरव्हायव्हर गिल्ट) जगत आहेत. अपघाताच्या भीतीने त्यांनी जवळपास अडीच महिने प्रवास केला नाही आणि शेकडो प्रवाशांच्या मृत्यूनंतर शेवटी सप्टेंबर 2025 मध्ये ते लंडनला परतले. सध्या ते ब्रिटनच्या लीस्टर शहरात त्यांची पत्नी आणि 5 वर्षांच्या मुलासोबत राहतात, पण ते बहुतांश वेळ घरातच घालवणे पसंत करतात.

शारीरिक आणि आर्थिक अडचणींचा सामना

हा मानसिक आघात इतका मोठा आहे की विश्वास आता गर्दीपासून दूर राहतात आणि स्वतःला एका खोलीत बंद करून घेतात. नैराश्यामुळे ते आपल्या पत्नी आणि मुलाशीही नीट संवाद साधू शकत नाहीत. या मानसिक त्रासासोबतच त्यांना आर्थिक आणि शारीरिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. अपघातातून बाहेर पडताना त्यांच्या खांद्याला, पाठीला आणि हाताला दुखापत झाली होती, ज्यामुळे ते अद्याप कामावर जाऊ शकलेले नाहीत आणि गाडी चालवणेही त्यांना शक्य होत नाही. त्यांचा दीव येथील मासेमारीचा कौटुंबिक व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. 

एअर इंडिया आणि टाटा ग्रुपकडून त्यांनी मदत मिळाली असली, तरी ब्रिटिश सरकारकडून कोणतीही थेट विशेष मदत मिळाली नाही. एका टप्प्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अवघ्या 1000 पाउंड म्हणजेच सुमारे 1 लाख रुपये यामध्ये अपना उदरनिर्वाह करावा लागला होता. आज 1 वर्षानंतरही विश्वास त्या भयानक क्षणांमधून बाहेर पडू शकलेले नाहीत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com