'देशभक्त असणं इतकं कठीण आहे?' सलमान खुर्शीद यांना काँग्रेस नेत्यांची वर्तवणूक खटकतेय? वक्तव्याची चर्चा

जनता दलाचे (यू) खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वातील एका सर्वपक्षीय शिष्टमंडळात सलमान खुर्शीद दौऱ्यावर आहेत. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूरचा दौरा केल्यानंतर सध्या मलेशियात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

काँग्रेस नेता सलमान खुर्शीद सध्या पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात एका मिशनअंतर्गत परराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग होऊ ते सध्या विविध देशांचा दौरा करीत आहेत. सोमवारी ते म्हणाले की, दहशतवाविरोधी काम करीत असताना देशभक्त होणं इतकं कठीण आहे का? काही दिवसांपूर्वी काँग्रेसने या शिष्टमंडळात आपल्या नेत्यांची नावं पाहून नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने सुचवलेल्या नावांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. 

जनता दलाचे (यू) खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वातील एका सर्वपक्षीय शिष्टमंडळात सलमान खुर्शीद दौऱ्यावर आहेत. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूरचा दौरा केल्यानंतर सध्या मलेशियात आहेत. या शिष्टमंडळात भाजपचे खासदार बृजलाल, प्रदन बरुआ, हेमंग जोशी आणि अपराजिता सारंगी, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बनर्जी, सीपीएमचे जॉन ब्रिटास आणि मोहन कुमार यांचा समावेश आहे.

Advertisement

खुर्शीदने सोशल मीडिया एक्सवर लिहिलंय, जगाला भारताचा संदेश देण्यासाठी जेव्हा दहशतवादविरोधातील मिशनवर असताना एक गोष्टीचं खूप दु:ख होतं. अशा परिस्थितही लोक राजकीय फायद्याबद्दल बोलतात. देशभक्त होणं इतकं कठीण आहे? असा सवाल खुर्शीद यांनी उपस्थित केला आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - G7 Summit : 6 वर्षात पहिल्यांदाच G7 बैठकीत पंतप्रधान मोदी सामील होणार नाहीत, काय आहे कारण?


तुम्ही भाजपच्या लोकांसह काय करताय? 

यावेळी खुर्शीद म्हणाले, या दौऱ्याबाबत मला सातत्याने एक प्रश्न विचारला जातो. तु्म्ही भाजपच्या लोकांसह काय करताय? जेव्हा देशासाठी आपण काही करतो तेव्हा असे प्रश्न त्रासदायक ठरतात. यावेळी मला एकच सांगायचं, जे देशासाठी आवश्यक आहे ते करतोय. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याने काही फरक पडत नाही. आज देशासाठी उभं राहणं आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, मी जेव्हा म्हणतो की देशभक्त असणे इतके कठीण आहे का? - हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे जे मला असे प्रश्न विचारतात. जेव्हा तुम्ही देशासाठी काहीतरी करू इच्छिता तेव्हा असे प्रश्न मन हेलावून टाकणारे असतात.