आज भारतासाठी गौरवाचा क्षण आहे. NASA ने Axiom-4 मिशन आता 25 जून रोजी लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. हे मिशन भारत, हंगेरी आणि पोलंड या तीन देशांसाठी ऐतिहासिक मानली जात आहे. विशेषत: भारतासाठी ही संधी अत्यंत खास आहे. कारण बऱ्याच अवधीनंतर एक भारतीय अंतराळात प्रस्थान करणार आहे. या मिशनमध्ये भारतीय वंशाचे इस्त्रोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) च्या दिशेने रवाना होतील. हा भारतासाठी दगडाचा मैल असल्याचं म्हटलं जात आहे.
Axiom-4 मिशन भारतासाठी गर्वाचा क्षण आहे. यामुळे देशाला अनेक फायदे मिळू शकतात. या मिशनमुळे भारताला अंतराळ संशोधनात आपली क्षमता वाढवण्याची आणि जागतिक स्तरावर आपली उपस्थिती निर्माण करण्याची संधी मिळेल. अॅक्सिओम-4 मोहीम केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही तर ती भारताची जागतिक प्रतिष्ठा, तांत्रिक क्षमता आणि आर्थिक शक्यतांना नवीन उंचीवर नेण्यासही तयार होईल. या मोहिमेत भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. 1984 नंतर पहिल्यांदा कोणी भारतीय अंतराळवीर या मिशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनचा भाग होणार आहे.
नक्की वाचा - B2 Bomber: अमेरिकेच्या B2 बॉम्बर निर्मितीत मुंबईकर इंजिनिअरचं योगदान, अन् 32 वर्षांचा तुरुंगवास
हा मिशन भारतासाठी का आहे महत्त्वपूर्ण...
विज्ञान आणि संशोधनातील प्रगती
Axiom-4 मिशन दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत. यात 31 देशांमधील वैज्ञानिक आणि संस्थांचा समावेश आहे. भारत आणि NASA च्या संयुक्त सहयोगामुळे 12 प्रयोग होतील. यामध्ये 7 भारतीय आणि 5 अमेरिकन संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रयोग प्रामुख्याने जैविक विज्ञान, मानवी आरोग्य, अवकाश जीवन प्रणाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असतील.
गगनयान आणि भविष्यातील मोहिमांचा पाया...
शुभांशू शुक्ला गगनयान मोहिमेचा भाग नसले तरी, अॅक्सिओम-4 मधील त्यांचा अनुभव गगनयान अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि मिशन डिझाइनसाठी उपयुक्त ठरेल. हे अभियान भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक आखण्यास देखील मदत करेल.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये शुभांशू शुक्ला काय करतील?
Axiom Space मध्ये वेबसाइटनुसार, चारही अंतराळ प्रवासी आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशनवर 14 दिवसांपर्यंत 60 प्रयोग करतील.शुभांशु शक्ला अंतराळात सात प्रयोग करतील. ज्याचा उद्देश भारतात सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधनाला प्रोत्साहन देणे आहे. भारताचे 2035 पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक बांधण्याचे आणि 2047 पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. भारत त्यासाठी तयारी करत आहे.