VIDEO: फुकट जेवण दिलं अन् आता 100 कोटींचा टर्नओव्हर, साध्या ढाब्याची कमाल सक्सेस स्टोरी

Sukhdev Dhaba Success Story: ट्रक ड्रायव्हर्स हेच त्यांचे चालते-फिरते जाहिरात फलक बनले, कारण त्यांनी सुखदेव ढाब्याचा अनुभव इतरांना सांगायला सुरुवात केली.

जाहिरात
Read Time: 3 mins

Truck Drivers Dhaba Success Story: एक साधा रोडसाईड ढाबा  दिवसाकाठी २७ लाख रुपयांहून अधिक कमाई करत असेल, तर तुमचा विश्वास बसेल? ही अविश्वसनीय वाटणारी गोष्ट १०० टक्के खरी आहे.  ही कहाणी आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध 'अमृत सुखदेव ढाबा'ची. सुरुवातीला एका छोट्याशा तंबूपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका मोठ्या 'फूड एंपायर'मध्ये रूपांतरित झाला आहे. वाचा ही खास सक्सेस स्टोरी...

​१९५६ मध्ये सरदार प्रकाश सिंह यांनी हा ढाबा सुरू केला. सुरुवातीला कसलाही दिखावा नव्हता, ना कोणते फॅन्सी बोर्ड, ना कोणते मोठे मार्केटिंग. साध्या ट्रक ड्रायव्हर्स आणि कॅब चालकांसाठी परवडणारी आणि घरच्या जेवणाची चव देणारा हा ढाबा होता. अनेकदा ज्यांच्याकडे पैसे नसायचे, त्यांना सरदारजी मोफत जेवण देत असत. हीच त्यांची पहिली आणि सर्वात प्रभावी 'मार्केटिंग' ठरली. ट्रक ड्रायव्हर्स हेच त्यांचे चालते-फिरते जाहिरात फलक बनले, कारण त्यांनी सुखदेव ढाब्याचा अनुभव इतरांना सांगायला सुरुवात केली.

Akola News: ताकझुरे अर्बन निधी घोटाळा उघड!, सर्व सामान्य ठेवीदारांना लावला लाखोंचा चूना

सुखदेव ढाब्याच्या यशाचे रहस्य...

अतिथी देवो भव: ​या ढाब्याच्या यशामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक ठरला तो म्हणजे विश्वास आणि आदरातिथ्य (Hospitality). सुरुवातीपासूनच ट्रक ड्रायव्हर्सना प्राधान्य देणे, त्यांना घरच्यासारखे वागवणे आणि प्रसंगी त्यांना विनामूल्य जेवण पुरवणे, यामुळे 'सुखदेव' हे केवळ नाव न राहता एक 'ब्रँड' बनले. ग्राहक जेव्हा एखाद्या व्यवसायावर मनापासून प्रेम करू लागतात, तेव्हा त्याची वाढ नैसर्गिकरित्या आणि वेगाने होते, याचे 'अमृत सुखदेव' हे उत्तम उदाहरण आहे.

Advertisement

 मालक चाखतात चव: ​आजही, या ढाब्यावर दिवसाला सुमारे ९० हजार ग्राहक येतात. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचे अन्न पुरवण्याचे गुपित काय आहे? याचे उत्तर साधे आहे - दर्जाशी कोणतीही तडजोड नाही. मालक आजही दररोज स्वतः जेवणाची चव घेऊन त्याची तपासणी करतात. पदार्थांचा दर्जा तपासण्यासाठी मालकाची स्वतःची उपस्थिती हेच या ढाब्याचे 'सीक्रेट वेपन' आहे.

जलद सेवा: ​केवळ चव आणि दर्जाच नव्हे, तर 'अमृत सुखदेव'ची जलद आणि कार्यक्षम सेवा ही देखील खास आहे. 'इतकी वेगवान सेवा की लोक म्हणतात, सुखदेव ढाब्यावर जा, तर पोटात भुकेची जाणीव होण्याआधीच ताटात जेवण येते.' ही त्यांची ख्याती आहे. स्वयंपाकाची कौशल्ये आणि वेळेचे व्यवस्थापन यांचा हा उत्तम मेळ आहे.

Advertisement

नक्की वाचा - BMC Election: समाजवादी पार्टीचं ठरलं! मुंबई महापालिकेच्या 150 जागा लढणार, फटका कोणाला बसणार?

तीन तत्वे : ​या ढाब्याने आजपर्यंत शून्य जाहिरात (Zero Advertisement) या धोरणाचे पालन केले आहे. मोठे होर्डिंग्ज नाहीत, टीव्ही जाहिराती नाहीत. त्यांचा एकच सोपा मंत्र आहे: उत्तम जेवण, जलद सेवा आणि स्वच्छ व्यवहार. या तीन साध्या तत्त्वांवर आधारित विश्वासाच्या बळावर, एका छोट्या तंबूने २७ लाख रुपयांपेक्षा जास्त दैनंदिन कमाईचा टप्पा गाठला आहे. 'अमृत सुखदेव'ची ही कहाणी सिद्ध करते की, कोणत्याही व्यवसायाच्या मुळाशी प्रामाणिकपणा आणि ग्राहकांप्रतीची निष्ठा असली, तर यश निश्चितच मिळते.

Advertisement