अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातानंतर एकएक गोष्टी समोर येत आहेत. काही जण आपल्या मुलांना, मुलींनी भेटण्यासाठी जात होतं. तर कुणी आपल्या नव्या संसाराची सुरूवात करण्यासाठी जात होतं. लग्नाला अवघी पाच महिने झालेले. पाच महिन्याच्या दुराव्यानंतर ती आपल्या पतीला भेटण्यासाठी लंडनला निघाला होती. पण नियतीला ते कदाचित मान्य नव्हतं. नव्या संसाराची सुरूवात करण्यासाठी ती निघाली खरी पण तिथ पर्यंत पोहचलीच नाही. तिचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खुशबू राजपुरोहित. ही मुळची राजस्थानमधील बालोतरा जिल्ह्यातील अराबा दुदावता या गावची रहिवाशी. जानेवारी महिन्यात तिचे विपूल सिंह यांच्या बरोबर लग्न झाले होते. विपूल हे पेशाने डॉक्टर आहेत. ते लंडनला राहातात. लग्न झाल्यानंतर व्हिजाची प्रक्रीया पार पाडायची होती. त्यासाठी जवळपास पाच महिने लागले. त्यामुळे लग्नानंतर पाच महिने खुशबू ही भारतातच होती. आता तिला व्हिसा मिळाला होता. त्यामुळे ती लंडनला जाण्यासाठी निघाली.
त्यासाठी तिने अहमदाबादवरून जाण्याचं निश्चित केलं. ति त्याच विमानात बसणार होती ज्याचा काही सेकंदात अपघात झाला. डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न घेवून खुशबू त्या विमानात चढली खरी पण पुढे जे काही झालं ते काळीज पिळवटून टाकणारं होतं. खुशबू सध्या तिच्या सासरी म्हणजेच लुणी येथे राहात होती. ती बुधवारी आपल्या गावाहून अहमदाबादला निघाली होती. गुरुवारच्या एअर इंडियाच्या फ्लाईटने ती लंडनला जाणार होती. ठरल्यानुसार ती एअर इंडियाच्या एआय-171 या विमानात बसली होती. मात्र हे विमान उडल्यानंतर लगेच मेघाणीनगर येथे कोसळले. यातच तिचा मृत्यू झाला.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या विमानात 242 प्रवाशी होते. त्या पैकी फक्त एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. अन्य प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात खुशबूचाही समावेश आहे. लग्नाला फक्त पाच महिने झाले होते. आता लंडन सारख्या शहरात सुखी संसाराची स्वप्न ती पाहात होती. पण तिचं स्वप्न स्वप्नच राहीलं. तिच्या कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. तर लंडनमध्ये पत्नीची वाट पाहात असलेल्या खुशबूच्या पतीलाही हा मोठा धक्का आहे.