लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर शुक्रवारी मतदान झालं. .या टप्प्यातील ताज्या आकडेवारीनुसार 61. 40 टक्के मतदान झालं. त्रिपूरामध्ये सर्वात जास्त 78.00 टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी 53.20 टक्के मतदान झालं. महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात 53.70 टक्के मतदान झालं. मणिपूरमध्ये 77.20 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 71.80 टक्के आसाममध्ये 70.07, जम्मू काश्मीरमध्ये 67.40, केरळमध्ये 65.00, कर्नाटकात 64.00, राजस्थानमध्ये 60.50, मध्य प्रदेशात 55.50 आणि बिहारमध्ये 54.20 टक्के मतदान झालं.
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांवर शुक्रवारी मतदान झालं. .
हिंगोली लोकसभा मतदार संघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 52.03% इतकं मतदान झाले आहे.
राज्यातल्या आठ लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 43.01 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक मतदान हे वर्धा लोकसभेत झाले आहे. तर हिंगोलीत सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40.5 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
वर्धा लोकसभेत दुपारी 3 वाजेपर्यंत 45.95 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी 9 वाजता 6.63% ,
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या कुटासा गावात त्यांनी मतदान केलं. मिटकरींसह त्यांच्या पत्नी कविता मिटकरी आणि आईंनी देखील मतदान केले,
वर्धा लोकसभेत दुपारी 1 वाजेपर्यंत 32.32 टक्के मतदानाची नोंद
राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी वरुड येथील नगरपरिषद मराठी विद्या मंदिर क्र.१ येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
अकोला लोकसभा मतदारसंघातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथल्या मतदान केंद्रावर दुपारच्या कडक उन्हातही मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. मतदानासाठी मतदारांनी मोठी गर्दी केल्याचे या ठिकाणी दिसत आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे 21 बॅलेट युनिट, 26 व्हीव्हीपॅट, आणि 11 कंट्रोल युनिट बदलण्यात आले आहेत. सध्या या ठिकाणी मतदान सुरळीत सुरू आहे.
राज्यातील 8 लोकसभा मतदार संघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 18.83% मतदानाची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक मतदान हे परभणी लोकसभेत 21.77 टक्के झाले आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांनी आपल्या कुटुंबासह अमरावतीच्या नेहरू मैदानावरील शाळेमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतदारांनी मतदान करावं असे आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसेच या निवडणुकीमध्ये विजय होईल असा विश्वास ही व्यक्त केला.
निवडणूक समाजाच्या हाती दिली आहे. त्यामुळे समाज काय तो निर्णय घेईल असे मत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यांनी लोकसभेसाठी मतदान केले. त्यानंतर ते बोलत होते.
भाजपा नेते माजी मंत्री, माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी रिसोड इथं कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे.
अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी अमरावतीकर त्यांच्या सूनेला आणि एका माजी सैनिकाच्या मुलीला लोकसभेत नक्की पाठवतील असा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आपल्या तळेगाव ठाकूर या मूळ गावी आपला मतदानाचा हक्क बजावला. अमरावतीची निवडणूक यशोमती ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 6.34 टक्के मतदान झाले आहे. या मतदार संघात भाजपच्या नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्यात लढत होत आहे.
अकोला लोकसभेसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत 7.17 % मतदानाची नोंद झाली आहे. या मतदार संघात प्रकाश आंबेडकरांचा सामना भाजपच्या अनूप धोत्रें बरोबर होत आहे.
परभणी लोकसभा मतदार संघात सकाळी 9 वाजे पर्यंत 9.77 % मतदानाची नोंद झाली आहे. राज्यातल्या 8 मतदार संघा पैकी परभणीमध्ये आता पर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.
खासदार अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये मतदानाचा अधिकार बजावला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाणांचे हे पहिलेच मतदान आहे. नांदेडमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगतो आहे.
राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी फक्त 7.45 % मतदानाची नोंद झाली आहे. तर त्रिपूरात सर्वाधिक 16.65 % मतदाना झाले आहे. देशात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी आपल्या मतदानचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्या बरोबर त्यांचा संपुर्ण परिवार हजर होता.
प्रकाश आंबेडकर यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे. ते अकोला लोकसभेतून वंचितचे उमेदवार आहेत. त्यांची लढत भाजपच्या अनूप धोत्रें बरोबर आहे. काँग्रेस उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत तिरंगी झाली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व आमदार बच्चू कडू यांनी बेलोरा येथील आपल्या मूळ गावी आपला मतदानाचा हक्क बजावला.
अमरावती लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी दर्यापूर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
नांदेडच्या देगलूर तालुक्यातील निप्पानी सावरगाव येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडलीय. मागील दीड तासापासून मशीन बंद पडली आहे. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया खोळंबली आहे.
महायुतीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांनी सपत्नीक मतदान केले. देवळी इथल्या मतदान केंद्रावर ते मतदानासाठी गेले होते. यावेळी विजयाची हॅट्रीक करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाला होता.
हिंगोली लोकसभा अंतर्गत येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात मतदान यंत्रात तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे काही काळ मतदान थांबले होते. माहूर तालुक्यातील टाकळी येथील ही घटना आहे. केंद्र प्रमुखांनी वरिष्ठांना ही माहिती दिल्यावर तत्काळ तज्ज्ञांनी तेथे पोहोचून मतदान प्रक्रिया सुरू केली.
वर्धा लोकसभेच्या देवळी मतदान केंद्रावर सावळा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी काही काळ मतदान यंत्र बंद होते. त्यामुळे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी मतदानासाठी वाट पाहावी लागली.
अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर कवरराम हायस्कूल, वडरपुरा आणि रुख्मिनी नगर येथील मनपा हायस्कूल मधील ईव्हीएम बंद पडले होते. मशीन जवळपास 1 तास बंद होते. त्यामुळे काही मतदार मतदानासाठी वाट पाहात थांबले होते. तर काही नागरीक मतदान न करताच परत गेले.
नांदेड लोकसभेचे काँग्रेचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी नायगाव तालुक्यात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सरासरी 65% मतदान झाले होते. यावेळी प्रशासनाने 75% पेक्षा जास्त मतदानाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
वाशिम जिल्ह्यातील कानडी येथील सचिन भोयर यांनी आधी मतदान मग लग्न म्हणत मतदानाचा हक्क बजावला. बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.
वर्ध्यात आज लोकसभेचे मतदान होत असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
अकोला लोकसभेचे काँग्रेस उमेदवार डॉ अभय पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. अकोला लोकसभेत काँग्रेस भाजप आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत होत आहे.
अमरावतीत दोन मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबले, मतदान यंत्र बदलण्याची प्रक्रीया सुरू. अमरावती शहरातील संत ज्ञानेश्वर कवरराम स्कूल मधील ईव्हीएम बंद, यासह ग्रामीण भागातील एक ईव्हीएम मशीन बंद.
वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सकाळी 7 वाजता पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 1 हजार 76 मतदान केंद्रावर 9 लाख 79 हजार 237 मतदार असून आपल्या मतदानाचा हक्क बाजावणार आहेत.
माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी नांदेडमध्ये मतदानाचा अधिकार बजावला. सावंत हे अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. नांदेडमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे.
बुलढाणा लोकसभेसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 82 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी 1162 मतदान केंद्र बनवण्यात आले आहेत. तसेच या मतदानाकरिता 11 हजार 592 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले असून पाच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्त करता तैनात करण्यात आले आहे.
काही उद्योगपतींचं सरकार हवं की 140 कोटी जनतेचं, राहुल गांधीचा ट्विटमधून सवाल, घरातून बाहेर पडत मतदान करण्याचं केलं आवाहन.
- Rahul Gandhi (@RahulGandhi) April 26, 2024
देश की तकदीर का फैसला करने जा रहे इस ऐतिहासिक चुनाव का आज दूसरा चरण है।
आपका वोट तय करेगा कि अगली सरकार 'चंद अरबपतियों' की होगी या '140 करोड़ हिंदुस्तानियों' की।
इसलिए हर नागरिक का कर्तव्य है कि वह आज घर से बाहर निकले और 'संविधान का सिपाही' बन कर...
विक्रमी संख्येनं मतदान करा, पंतप्रधान मोदींचं मराठीत आवाहन, युवा, महिलांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याची दिली साद
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, आज मतदान होत असलेल्या, मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते. विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. तुमचे मत...
- Narendra Modi (@narendramodi) April 26, 2024
अमरावती लोकसभा मतदार संघासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे मैदानात आहेत. तर प्रहारनेही आपला उमेदवार रंगणात उतरवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world