जगावरचे तिसऱ्या महायुद्धाचे ढग विरत चाललेत की काय अशी दिलासादायक आणि आशादायक स्थिती निर्माण झालीय. त्याचं कारण म्हणजे भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेला आठवडाभराचा तणाव आता निवळण्याची चिन्ह आहेत. अगदी भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी होत असल्यानं भारतीयांना दिलासा मिळाला आहे.
LIVE Updates: मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन
एस. पी. हांगे व व्ही. व्ही. कंठाळे यांना कोणतेही आदेश नसताना मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहून राजशिष्टाचार आदेशाचे उल्लंघन केले . तसेच राज शिष्टाचाराच्या बाबतीत कोणतीही तरतुदीचे पालन न करता कृती केली आहे यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक) नियम 1979 चे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. यासंबंधी माजी आमदार वैभव नाईक यांनी ही घटना उघडकीस आणली होती.
त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर जिल्हाधिकारी तसेच कणकवली प्रांताधिकारी यांना देखील नोटीस बजावत झेड प्लस सुरक्षा असताना ते दोन अधिकारी गेले ही बाब गंभीर असल्याचे सांगत यासंबंधी खुलासा करावा असे सांगण्यात आले आहे
Akola Accident: अकोल्याच्या पातुर रोडवर दुचाकी आणि चारचाकी विचित्र अपघातात दोघे गंभीर जखमी
अकोल्याच्या पातुर रोडवर भीषण अपघात.. अपघातामध्ये दुचाकीस्वार वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले. या दरम्यान, अकोल्याच्या पातुर रोडवरील अमनदीप हॉटेल समोर हा अपघात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झाला असून जखमी व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचारासाठी पाठवलं आहे.. पातुरकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेमध्ये बार्शीटाकळी शहरांमधील माळीपुरा येथील वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत
Hingoli News: हिंगोली शहरात एसटी बसवर अज्ञात व्यक्तीची दगडफेक, एक महिला जखमी
- हिंगोली शहरात एका अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली आहे, हिंगोली आगाराच्या बसवर हे दगडफेक करण्यात आले असून या घटनेत एक महिला प्रवासी जखमी झाली आहे, या अज्ञात व्यक्तीकडून बसमधील वाहक आणि प्रवाशाना देखील मारहाण करण्यात आली आहे, या घटनेमुळे एसटी बस मधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता दरम्यान या दगडफेकीमध्ये बसच्या काचांचे नुकसान झाले आहे, दरम्यान घटनास्थळी हिंगोली शहर पोलिसांनी धाव घेतल्यानंतर दगडफेक करणारा अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाला असून हिंगोली शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे, बसची तोडफोड नेमकी का करण्यात आली याचं कारण अद्याप समोर आल नाहीय..
LIVE Updates: दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू
दोन वाघाच्या झुंजी मध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी बफरमध्ये कक्ष क्रमांक 63 मध्ये घडली. दोन वाघाची झुंज झाली असून यामध्ये छोटा मटका या वाघाने दुसऱ्या वाघाला झुंजीत ठार केले आहे, काल सगळीकडे जंगलामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना सुरू होती त्याच दिवशी सफारी करत असलेल्या पर्यटनकांना तसेच मचानावर असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अचानक दोन वाघाची झुंजीचा आवाज ऎकू आला, वाघाचा शोध घेतला असता त्यामध्ये एक वाघ मृत अवस्थेत आढळून आला. तसेच दुसऱ्या वाघाचे नाव छोटा मटका असून हा सुद्धा जखमी झाला आहे.
Pandharpur News: पंढरपुरात मुसळधार पाऊस
पंढरपूर आज संध्याकाळी गार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेला अवकाळी मुसळधार पाऊस साधारण सुमारे १ तासाहून अधिक काळ सुरू होता. पंढरपुरातील चौफाळा, सरगम चौक आणि तालुका पोलीस स्टेशन जवळील रेल्वे पुलाखालील सखल भागात पाणी साचले गेले. मुसळधार पावसामुळे विठ्ठल मंदिर परिसरातील भाविकांची मोठी तारांबळ उडाली गेली..अचानक पडलेल्या पावसामुळे कडक उन्हाळ्यामध्ये अल्हाद गारवा वातावरणात पसरला गेला आहे..
LIVE Updates: बाधित शेतकऱ्यांचा रेल्वे रुळावर सहा तासांपासून ठिय्य
बाधित शेतकऱ्यांचा रुळावरचा ठिया गेल्या सहा तासांपासून कायम.
पुण्याहून मिरज कोल्हापूर आणि कर्नाटक कडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प.
एक पॅसेंजर सह सह्याद्री व महालक्ष्मी एक्सप्रेस भिलवडी रेल्वे स्थानकावर गेल्या अर्धा तासाहून अधिक काळापासून थांबून.
रेल्वे प्रशासनाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा,यासाठी शेतकरी आक्रमक.
जिल्हाधिकाऱ्यांकडून बाधित शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती.
LIVE Updates: राज्यातील 7 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या … अधिकारी आणि नवं नियुक्ती
रविंद्र शिसवे - सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग
शारदा वसंत निकम -विशेष पोलिस महानिरीक्षक, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
निसार तांबोळी - विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दर
एन डी रेड्डी - पोलिस सहआयुक्त, नागपूर
सुप्रिया पाटील-यादव - विशेष पोलिस महानिरीक्षक, आस्थापना
राजीव जैन - विशेष पोलिस महानिरीक्षक, सागरी सुरक्षा
अभिषेक त्रिमुखे - विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशासन
Live Updates: राष्ट्रवादीच्या आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, ट्रकची धडक
अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या गाडीला विटे घाटात अपघात झालाय..
आमदार लहामटे अकोले येथून राजूर कडे जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रक ने धडक दिल्यानं वाहनाच्या पुढील भागाचे नुकसान झालेय..
तर लहामटे यांना कुठलही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहीती आहे..
डॉक्टर किरण लहामटे हे अकोले विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत..
Accident News: टाटा मॅजिक अपघातात दोन जण ठार, 16 जण गंभीर जखमी
विरूद्ध दिशेने शासकीय धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाने समोरुन प्रवाशी घेऊन निघालेल्या काळी पिवळी टाटा म्यजिकला धडक दिली या धडकेत दोघांचा मृत्यू तर १६ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील चितेगाव जवळ घटना घडली. म्यजिक चालका सह एक प्रवाशी घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस घटनास्थळी पोहोचत जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास मुल पोलिस निरीक्षक करीत आहेत.
LIVE Updates:हिंगोली शहरात एसटी बसवर अज्ञात व्यक्तीची दगडफेक, एक महिला जखमी
हिंगोली शहरात एका अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली आहे, हिंगोली आगाराच्या बसवर हे दगडफेक करण्यात आले असून या घटनेत एक महिला प्रवासी जखमी झाली आहे, या अज्ञात व्यक्तीकडून बसमधील वाहक आणि प्रवाशाना देखील मारहाण करण्यात आली आहे, या घटनेमुळे एसटी बस मधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता दरम्यान या दगडफेकीमध्ये बसच्या काचांचे नुकसान झाले आहे, दरम्यान घटनास्थळी हिंगोली शहर पोलिसांनी धाव घेतल्यानंतर दगडफेक करणारा अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरून पसार झाला असून हिंगोली शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे, बसची तोडफोड नेमकी का करण्यात आली याचं कारण अद्याप समोर आल नाहीय..
Live Updates: दहशतवाद्यांचा पाठिंबा थांबेपर्यंत सिंधू जल करार स्थगित: परराष्ट्र मंत्रालय
रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले की, 'पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला दिलेला पाठिंबा पूर्णपणे आणि कायमस्वरूपी थांबवेपर्यंत भारताकडून सिंधू जल करार स्थगित ठेवण्यात येईल. 'सिंधू जल करार चांगुलपणा आणि मैत्रीच्या भावनेतून करण्यात आला होता, जे कराराच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे नमूद आहे. त्यानंतरही, पाकिस्तानने दशकानुदशके सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देऊन या तत्त्वांना तिलांजली दिली आहे."
Live Update : पाकव्याप्त काश्मीर रिकामं करा, भारतानं ठणकावलं
पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर पाकिस्ताननं अवैध कब्जा केला आहे, तो रिकामा करा या शब्दात भारतानं पाकिस्तानला ठणकावलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज (13 मे ) घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. जम्मू काश्मीरबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा होईल. कुणाचीही मध्यस्थी मान्य केली जाणार नाही, असंही भारतानं स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तानं गोळीबार थांबवला तर आम्हीही गोळीबार थांबवू, असं पराराष्ट्र मंत्रालयाच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
PM Narendra Modi Speech: शत्रूंना फक्त भारत माता की जय ऐकू येते: PM मोदी
भारत माता की जय फक्त घोषणा नाही ही त्या प्रत्येक सैनिकाची शपथ आहे जो भारतमातेसाठी जिवाची बाजी लावतो. भारत माता की जय मैदानात ही घुमतो आणि मोहिमेतही घुमते. भारताचे सैनिक भारत माता की जय म्हणतात तेव्हा शत्रुंचे काळीज चिरते. जेव्हा आपले ड्रोन, मिसाईल लक्ष्यांवर केंद्रीत होतात तेव्हा शत्रुंना भारत माता की जय ऐकू येते.
जेव्हा आपले सैन्य न्युक्लिअर ब्लॅकमेलच्या धमकीची हवा काढतात तेव्हा आकाश ते पाताळ फक्त भारतमातेचाच जयघोष होतो. तुम्ही प्रत्येक भारतीयाची मान उंचावली आहे. तुम्ही नवा इतिहास रचला आहे. मी आज तुमचे दर्शन करायला आलो आहे. शूरविरांचे पाय जमिनीवर पडतात तेव्हा धरती धन्य होते. अशा विरांचे दर्शन मिळाले की आयुष्य धन्य होते. भारताच्या पराक्रमाची कायम चर्चा होईल त्यामधला सर्वात महत्वाचा अध्याय तुम्ही आणि तुमचे असतील. मी विरांच्या या धरतीवरुन एयरफोर्स, नेव्ही, सर्वांना सलाम करतो.
Mumbai News : प्लॅटफॉर्म क्लीन करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली, CSMT स्थानकातील घटना
Mumbai News : सीएसएमटी स्थानकात मोठा अपघात टळला
प्लॅटफॉर्म क्लीन करणारी मशीन रेल्वे ट्रॅकवर कोसळली
मोटारमनने वेळीच सावधान होत जागेवर लोकल थांबवली
क्लीनिंग मशीनमध्ये अनेक मोठ्या ज्वलनशील बॅटरीज होत्या
त्यामुळे सीएसएमटी स्थानकातील मोठा अपघात टळला
ट्रॅकवरून ही मशीन बाहेर काढायला वेळ लागल्याने बराच वेळ लोकल स्थानकाच्या बाहेर खोळंबली
सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 7 वरील ही घटना
PM नरेंद्र मोदींनी घेतली आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी आदमपूर एअरबेसवर जवानांची घेतली भेट. पाकिस्तानविरोध केलेल्या धाडसी कामगिरीनंतर एअर फोर्सच्या जवानांशी चर्चा केली.
पेन्शन नातेवाईकांना दिल्याने मुलाकडून आईला कुकरणे मारहाण, सोलापुरातील घटना
पेन्शन नातेवाईकांना दिल्याने मुलाने आईला कुकरणे मारल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. विजयालक्ष्मी चिंचणपुरे असे जखमी झालेल्या आईचे नाव आहे. या प्रकरणी जेलरोड पोलिसांनी मुलगा हर्षल चिंचणपुरे या संशयित आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Pune Rain : पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात, अनेक जोरदार सरी
पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात
शहरातील अनेक भागात पाऊस सुरू
सकाळपासून शहरात आहे ढगाळ वातावरण
हवामान विभागाने तीन दिवस दिलाय पावसाचा इशारा
अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ
Pune Rain : पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात, अनेक जोरदार सरी
पुण्यात अवकाळी पावसाला सुरुवात
शहरातील अनेक भागात पाऊस सुरू
सकाळपासून शहरात आहे ढगाळ वातावरण
हवामान विभागाने तीन दिवस दिलाय पावसाचा इशारा
अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ
जम्मू -काश्मीरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा
जम्मू -काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई
शोपियनच्या जंगलात 4 दहशतवाद्यांशी चकमक सुरू
एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती
तीन दहशतवाद्यांना जवानांनी घेरल्याची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशकवादी शाहीद देखील असल्याची सूत्रांची माहिती
आधी अवकाळी आणि आता कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत
धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. उन्हाळी कांदा काढणीला आल्यावर अवकाळीचा तडाखा बसला. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने नुकसान झालं आणि त्यातच जो कांदा निघाला तो विक्री करण्याची वेळ आल्यावर कांद्याचे दर घसरले आहेत. दोन महिन्यांपूर्वी 40 रुपये किलो असलेला कांद्याचा दर 10 रुपये प्रति किलोवर आला आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. एकीकडे गृहीणींना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलं आहे. त्यामुळे कांद्याला किमान 25 ते 30 रुपये दर मिळावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांतून केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, महिलेचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जण जखमी आहेत. कुशीत 6 महिन्यांच्या चिमुकली असतानाच आईने सोडलं प्राण. अपघातात तीन चिमुकल्या जखमी झाल्या आहेत. सर्व जखमींवर वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.
Mumbai News : राज्यात किंवा देशात कुठेही ब्लास्ट होण्याची मेलद्वारे धमकी
राज्यात किंवा देशात कुठेही ब्लास्ट होण्याची धमकी
डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला धमकीचा मेल
तीन दिवसात अचानक मोठा ब्लास्ट होणार असल्याची व्यक्त केली भीती
सोमवार ते बुधवार दरम्यान सतर्क राहण्याचा दिला इशारा
मुंबई पोलिसांकडून मेल मिळाल्यानंतर तपासाला सुरुवात
Nashik News : इगतपुरीमध्ये 24 वर्षीय तरुणीचा अंगावर वीज पडून मृत्यू
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन गावी रविवारी सायंकाळी वीज पडून एका 24 वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला. पूजा त्र्यंबक भांगरे असे मयत युवतीचे नाव आहे. घराजवळच शेतावर पूजा काम करत असताना सायंकाळी सहाच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाल्याने पूजा अंगणात वाळत घातलेल्या पापड कुरडया उचलायला जात असतानाच अंगावर वीज पडली. पूजाच्या अशा जाण्याने कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे..
Mumbai Rain : मुंबई उपनगर भागात मुसळधार पावसाची हजेरी
मुंबईच्या उपनगरात गेल्या १० ते १५ मिनिटांपासून मुसळधार अवकाळी पाऊस सुरू आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातारवरण होते. सध्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, विलेपार्ले आणि सांताक्रूझसह अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. पूर्व उपनगरात मुलुंड, भांडूप, विक्रोळी परिसरातही पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता.
बुलढाण्यात कार-ट्रकचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, 4 जण जखमी
बुलढाणा: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा शहराजवळ भीषण अपघात
कार आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात
अपघातात कारमधील ३ जण ठार तर ४ जण गंभीर जखमी
जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक
अपघात इतका भीषण होता की कारमधील अडकलेल्या जखमी व मृतांना बाहेर काढण्यासाठी दोन तास प्रयत्न करावे लागले
Live Update : गेल्या वर्षी सर्वाधिक निकाल कोकण विभागातून, यंदा कोण मारणार बाजी?
2024 मध्ये दहावीचा निकाल 95.81 टक्के लागला होता. नेहमीप्रमाणे मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त होतं. गेल्या वर्षी 97.21 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या, यात मुलांची संख्या 94.56 टक्के इतकी होती. कोकण विभागातून सर्वाधिक (99.01 टक्के) निकाल लागला होता तर नागपूर विभागातून सर्वात कमी (94.73 टक्के) निकाल लागला होता.
Live Update : दहावीचा निकाल कुठे पाहू शकता?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
mahresult.nic.in
mahahsscboard.in
Live Update : अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने औंढा शहरात खळबळ
हिंगोलीच्या औंढा शहरातील बसस्थानक परिसराच्या मागे एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या भागात काही नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने ही घटना उघडकीस आली आहे. दरम्यान औंढा पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत महिलेच्या मृतदेहाची पाहणी केली. यावेळी हा मृतदेह गेल्या आठ दिवसांपूर्वीचा असावा असा अंदाज पोलिसांनी काढला आहे. दरम्यान मृतदेहाचा केवळ सांगाडा दिसत असल्याने या महिलेची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. मात्र घटनास्थळावर सापडलेल्या काही वस्तूंच्या आधारे पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
Live Update : जम्मू-काश्मीरमधील सांबामध्ये परिस्थिती पूर्वपदावर
Live Update : शिवसेना ठाकरे गटाची 17 मे रोजी मुंबईत बैठक
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची 17 मे रोजी मुंबईत बैठक होत आहे. या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातील आढावा घेतला जाणार आहे. यासाठी बूथ, गट, तालुका, जिल्हानिहाय निवडणूक तयारीची माहिती घेतली जाणार आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या जिल्हानिहाय सभांचे नियोजन होणार आहे.
Live Update : भाजपची आजपासून देशभर तिरंगा यात्रा... '
भाजपची आजपासून देशभर तिरंगा यात्रा... 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या उद्देशाने यात्रेचं आयोजन... आजपासून 23 मे पर्यंत सुरू राहणार तिरंगा यात्रा...
Live Update : गडचिरोली वनविभागातर्फे उजळ रात्री ‘निसर्ग अनुभव’ कार्यक्रम
-गडचिरोली म्हटले की डोळ्यासमोर चित्र ऊभे होते ते म्हणजे घनदाट जंगल व नक्षली परंतू आता तसे नाही...... वनविभागाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने, गुरवळा नेचर सफारी येथे ‘निसर्ग अनुभव’ या विशेष उपक्रमांतर्गत प्राणीगणना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी गुरवळा नेचर सफारी परिसरातील वनक्षेत्रात एकूण ११ मचाणे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक मचानावर एकावेळी ३ ते ४ व्यक्ती बसून वन्यजीवांचे निरीक्षण करू शकतील. यात विविध पाणवठ्यांवर तयार केलेल्या लाकडी आणि लोखंडी मचाणांचा समावेश आहे. प्राणीगणना प्रत्यक्षदर्शी निरीक्षणासोबतच ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातून देखील केली जाणार आहे. निसर्गप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी हा एक अनोखा अनुभव असणार आहे