Maoist movement : चळवळ अजून संपलेली नाही, बसवराजू खात्म्यानंतर माओवाद्यांचं 10 जून रोजी 'भारत बंद'चं आवाहन

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव उर्फ बसवराजूला ठार करण्यात आलं. यामध्ये 27 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, प्रतिनिधी

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव उर्फ बसवराजूला ठार करण्यात आलं. या चकमकीत माओवाद्यांची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आणि 27 माओवाद्यांना ठार करण्यात आलं. दरम्यान यावर संतापलेल्या माओवाद्यांनी 10 जून रोजी भारत बंदचं आवाहन केलं आहे. यावेळी चळवळी अद्याप संपली नसल्याचं सांगत माओवाद्यांकडून भूपती उर्फ अभयने एक पत्रक जारी केलं आहे. 

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माओवाद्यांचेहे पत्र, आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा

प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीचा सरचिटणीस आणि माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजू उर्फ नंबाला केशव राव याचा 21 मी रोजी छत्तीसगढ येथे चकमकीत खात्मा झाला होता. या चकमकीत 27 माओवादी ठार झाले होते. त्यामुळे  माओवादी या चकमकीतून बसलेल्या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. त्यापूर्वी कर्रेगुट्टा पहाडीत सलग दोन आठवडे चाललेल्या मोहिमेत निर्णायक पराभव झाल्याने माओवाद्यांना जबर हादरा बसला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Naxalite : बसवराजूनंतर सुरक्षा दलाला आणखी एक यश; 10 लाखांचं बक्षीस असलेला एक बडा नक्षलवादी ठार

माओवाद्यांविरोधात केंद्र आणि  राज्य सरकारने पुकारलेल्या मोहिमेत जानेवारी 2024 पासून आतापर्यंत 540 माओवादी मारण्यात आल्याची कबुली या पत्रकात देण्यात आली आहे. मारल्या गेलेल्या माओवाद्यांच्या स्मरणार्थ आणि केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी येत्या दहा जून रोजी भारत बंदचं आवाहन करण्यात आले असून देशभर 11 जून ते 3 ऑगस्ट दरम्यान स्मारक सभा आयोजित करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. पत्र जारी करणाऱ्याच्या जागी नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य भूपती उर्फ अभय याचे नाव आहे.

Advertisement

माओवादी पार्टीला धक्का बसल्याची आणि नुकसान झाल्याची कबुली देत असतानाच हे नुकसान शाश्वत नसेल तसेच चळवळ संपणार नाही असे केंद्रीय समितीच्या या पत्रात म्हटले आहे.  चारू मुजुमदार नंतर गेल्या 53 वर्षांत  अनेक मोठे नेते मारले गेले तरी चळवळ पुन्हा उठून उभी राहिली असे या पत्रकात म्हटले आहे. चार दशकानंतर माओवाद्यांचा शीर्षस्थ नेता मारल्या गेल्याचे आणि त्या चकमकीत एकूण 27 माओवादी मारल्या गेल्याचे या पत्रकात कबूल करण्यात आले आहे.

Advertisement