Video: मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील 19 वाहनं रस्त्यांवर एकदम बंद! कारण समजल्यावर बसेल धक्का

MP CM Mohan Yadav :  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील 19 पैकी 19 वाहनं गुरुवारी अचानक बंद पडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
MP CM Mohan Yadav : ही सर्व वाहनं बंद पडण्याचं कारण धक्कादायक आहे.
मुंबई:

MP CM Mohan Yadav : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील 19 पैकी 19 वाहनं गुरुवारी अचानक बंद पडली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सर्व वाहन अचानक बंद झाल्यानं एकच खळबळ उडाली. यादव रतलाममध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील एसयूव्ही वाहनं रतलामच्या दिशेनं जात होता. पण, ती अचानक एकामागून एक बंद पडली. त्यामुळे ड्रायव्हर्सना धक्के ते त्यांना बाजूला करावं लागलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे कारण?

मुख्यमंत्र्यांच्याच ताफ्यातील वाहनं बंद पडल्यानं अधिकाऱ्यांना पर्यायी वाहनांसाठी धावपळ करावी लागली. त्याचबरबोर त्यांनी स्थानिक पंपावर इंधनात भेसळ आहे का? हे तपासले. अन्न व नागरी पुरवठा विभागाने नमुने गोळा केले आणि पंपातून पुरवठा केलेल्या डिझेलमध्ये पाणी असल्याची धक्कादायक गोष्ट उघड झाली. 

ताफ्यातील एक चालक शुभम वर्मा म्हणाला, 'सुरुवातीला एक-दोन वाहनांमध्ये समस्या आली, पण लवकरच सर्व वाहनं थांबली. आम्ही एका स्थानिक पेट्रोल पंपातून 350 लिटरहून जास्त डिझेल भरले होते. आम्ही कर्मचाऱ्यांशी बोललो, तेव्हा त्यांनी भेसळीची शक्यता नाकारली. पण एका स्थानिक रहिवाशाने आम्हाला त्याच पंपातून भरलेली बाटली दाखवली. त्यामध्ये डिझेल आणि पाण्याची स्पष्ट थर दिसत होते.

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash : शेवटच्या सेकंदात काय झालं? 'ते' रहस्य आता उलगडणार, ब्लॅक बॉक्समधून मिळाला डेटा
 

अन्न विभागाचे अधिकारी आनंद गोळे यांनी सांगितलं की, 'आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. या टप्प्यावर पाण्याची नेमकी किती मात्रा आहे हे आम्ही सांगू शकत नाही, पण आम्ही साठ्याची तपासणी करत आहोत आणि रतलाम जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर अहवाल सादर करू.' हा पेट्रोल पंप सील करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

Advertisement

आता प्रशासन आणि अन्न विभागाचे अधिकारी इंधनाचा साठा आणि पंपाचे रेकॉर्ड तपासत आहेत. पेट्रोल पंपाच्या विक्री अधिकाऱ्याने यावर काहीही बोलण्यास नकार दिला.  मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या दौऱ्यावर कोणताही परिणाम झाला नाही, परंतु या घटनेने मध्य प्रदेशातील इंधनाच्या गुणवत्तेमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Topics mentioned in this article