Operation Sindoor : भारतीय लष्कराची पाकिस्तानवर कारवाई आणि चीनला इशारा! समजून घ्या अर्थ

Operation Sindoor : भारतीय लष्करनं राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मुळे पाकिस्तानला धक्का बसलाय. त्याचबरोबर पाकिस्तानचा कट्टर पाठिराखा असलेल्या चीनलाही यामुळे भारतानं चपराक दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

हेमाली मोहिते, प्रतिनिधी

Operation Sindoor : पहलगाममध्ये 26 निरपराध भारतीयांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना भारताने धडा शिकवला आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केलेत. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी ठार झाले आहेत. भारतीय लष्करनं राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मुळे पाकिस्तानला धक्का बसलाय. त्याचबरोबर पाकिस्तानचा कट्टर पाठिराखा असलेल्या चीनलाही यामुळे भारतानं चपराक दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

चीनकडून पाकिस्तानची पाठराखण

भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या मदतीसाठी चीननं सर्वप्रथम धाव घेतली. पाकिस्तानचा सच्चा मित्र असल्यानं चीनला प्रतिक्रिया देणं भाग होतं.भारताची आज सकाळी झालेली लष्करी कारवाई दुर्दैवी आहे. सद्यस्थितीबाबत आम्ही चिंतेत आहोत. भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शेजारी देश आहेत आणि चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करतो.

दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्याच्या दृष्टीने विचार करावा, संयम बाळगावा, शांतता राखावी आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, असे आम्ही दोघांनाही आवाहन करतो, असं चीनने म्हटलंय. 

Advertisement

( नक्की वाचा :  Operation Sindoor : आजवरच्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा 'ऑपरेशन सिंदूर' चं वेगळेपण काय? संपूर्ण माहिती वाचून वाटेल अभिमान! )

चीनसाठी डोकेदुखी का?

भारत पाकिस्तान युद्ध हे चीनसाठी  डोकेदुखी ठरणार हे तर स्पष्टच आहे. पाकिस्तानात चीनचे महत्त्वाचे प्रकल्प सुरु आहेत. खरं तर त्या प्रकल्पांवरही स्थानिकांनी हल्ले चढवून त्यांना नामोहरम केलंच आहे.मात्र युद्ध झालंच तर या प्रकल्पांना फटका बसेल अशी चीनची भीती आहे. 

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे चीननं गेल्या काही वर्षांत पाकिस्तानला सुमारे 2 अब्ज डॉलरपर्यंतचं कर्ज दिलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या मुडीजच्या अहवालानुसार पाकिस्तानची कर्ज फेडण्याची क्षमता कमीच आहे आणि युद्ध झालंच तर पाकिस्तानची ही क्षमताही खर्ची होईल. म्हणजेच चीनला कर्जाची परतफेड करणं पाकिस्तानला जड जाईल याचाच अर्थ चीनला त्यांचा पैसा अडकण्याची भीती आहे. 

Advertisement

तिसरं कारण म्हणजे चीनला अमेरिकेसह सुरु असलेल्या व्यापार युद्धातून लक्ष हटवावं लागेल. तसंच ऑपरेश सिंदूरमध्ये भारतीय लष्करानं दाखवलेलं सामर्थ्य पाहून भारताला कमी लेखण्याची चूक चीन करणार नाही.