पहलगाम, विमान दुर्घटना, युद्धाचे भाकीत खरे ठरले; आता राज्यातील बड्या पक्षाबद्दल केली भविष्यवाणी

कायदा किंवा बिल पास होण्यात सत्ताधारी पक्षाची सरशी होईल. या काळात मोठ्या राजकीय व्यक्तीचे किंवा प्रमुख पदावरील व्यक्तींचे राजीनामे, निवृत्ती किवा मृत्यूच्या घटना संभवतात, असंही भाकीत सिद्धेश्वर मारटकर यांनी व्यक्त केलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारताने 2025 वर्षात दहशतवादी हल्ला, युद्ध, विमान दुर्घटना, रेल्वे दुर्घटना अशा अनेक घटना पाहिल्या. अचानक समोर आलेल्या या घटना अनेकांना अनपेक्षित होत्या. मात्र ज्योतिषी सिद्धेश्वर मराटकर यांनी याबाबतचे काही अंदाज गेल्यावर्षी दिवाळीतच वर्तवले होते. दीपावली विशेषांक २०२४ ज्योतिष ज्ञानमध्ये सिद्धेश्वर मारटकर यांनी राजकीय, सामाजिक घडामोडी युद्ध, स्फोटक घटना, अपघात, घातपात याबाबत अंदाज वर्तवले होते. या दिवाळी अंकांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ज्योतिषी मारटकर यांनी काय अंदाज वर्तवले होते?

देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये बिघाड होऊ शकतो. शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. मोठा वादविवाद, युद्ध, अतिरेकी कारवाया, हिंसा होण्याचं भाकित मारटकर यांनी वर्तवलं होतं. या काळात मोठ्या राज‌कीय व्यक्ती, खेळाडू, पोलीस मिलिटरी यांचे अपघात किंवा घातपात या संभवतात. यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता राहील. 

मोठे कायदे / बिल गोंधळात मंजूर होतील. विरोधी पक्षांत फूट पडेल. One Nation One Election सारखे बिल मोठ्या गोंधळात पास होतील. कायदा किंवा बिल पास होण्यात सत्ताधारी पक्षाची सरशी होईल. या काळात मोठ्या राजकीय व्यक्तीचे किंवा प्रमुख पदावरील व्यक्तींचे राजीनामे, निवृत्ती किवा मृत्यूच्या घटना संभवतात, असंही भाकीत सिद्धेश्वर मारटकर यांनी व्यक्त केलं होतं.

शनी मंगळाचा षडाष्टक योग मोठ्या युद्धासाठी पोषक असून काही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतील. या योगामुळे मोठे अपघात / घातपात / अतिरेकी कारवाया / गूढ मृत्यू यामवून मोठी हानी संभवते. मोठे विमान अपघात किंवा हवाई हल्ले यातून मोठी हानी संभवते. क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल, असा अंदाज मारटकर यांनी सांगितला होता.

Advertisement

येत्या काळात काय घडू शकतं?

सिद्धेश्वर मारटकर यांनी सांगितलेल्या भाकितांबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितल की, मागच्या वर्षी सांगितलेले 80-90 टक्के भाकितं खरी ठरली आहेत. काश्मीरसारखा हल्ला होईल हे मागील वर्षी एप्रिलमध्ये सांगितलं होतं. सगळीकडे युद्धाची परिस्थिती, मे महिन्यातील अतिवृष्टी याबाबत मागच्या वर्षीच भविष्य सांगितलं होतं. 9 ऑगस्टपर्यंत हे परिणाम जाणवू शकतात.

येत्या काळात जुलै महिन्यात मुंबईत मोठा पाऊस पडेल. मुंबईला पाण्याचा धोका आहे, जो त्रासदायक आहे. याशिवाय राजकीय नेत्याची हत्या होण्याचाही अंदाज आहे. राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. एक मोठा राजकीय पक्ष फुटण्याचीही शक्यता आहे, अशी भाकिते सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवली आहे.  
 

Advertisement
Topics mentioned in this article